AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको… मोजावी लागेल मोठी किंमत

मेंदूतील थोडासा अडथळादेखील संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम करू शकतो. कधी-कधी शरीराच्या काही नसांमध्ये कमजोरी येते आणि त्रास होऊ लागतो. मज्जातंतूंच्या कमकुवतपणाची अनेक कारणे आहेत.

मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको... मोजावी लागेल मोठी किंमत
Brain-stroke-related-health
| Updated on: Feb 07, 2022 | 10:26 AM
Share

मुंबई : मेंदू (brain) हा शरीरातील सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. त्याच्या परवानगीशिवाय शरीर कुठलीही गोष्ट करु शकत नाही. त्यामुळे त्याचे आरोग्य टिकवून ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. अनेकदा आपल्या मेंदूच्या नसांमध्ये वेदना होतात. वास्तविक, याची अनेक कारणे आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. मेंदू सर्व मज्जातंतूंशी (nerves) जोडलेला आहे आणि त्यात थोडासा अडथळा देखील संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम करू शकतो. कधी-कधी शरीराच्या काही नसांमध्ये कमजोरी येते आणि त्रास होऊ लागतो. मज्जातंतूंच्या कमकुवतपणाची अनेक कारणे आहेत. मेंदूच्या नसांमध्ये कमजोरी (weakness) का येते आणि ती निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे, याबाबत आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

मेंदूला दुखापत, शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता आणि नसांवर दबाव या सर्व कारणांमुळे मेंदूला वेदना होत असतात. यासोबतच कधी संसर्गामुळे तर काही औषधांमुळे मेंदूच्या नसांमध्ये कमजोरी येते. याशिवाय, कधीकधी इतर कारणांमुळे मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा येतो. वास्तविक, मेंदूच्या कमकुवतपणामुळे सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही. यासोबतच कधी कधी मेंदूच्या विशिष्ट भागाकडे जाणार्‍या नसांमध्ये रक्त साचल्यामुळे अचानक तीव्र डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर तुमच्या शरीरात मुंग्या येत असतील तर ही देखील मेंदूच्या नसांच्या कमकुवतपणाची लक्षणे आहेत. मेंदूच्या नसांमध्ये रक्त योग्यरित्या पोहोचत नाही, ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात मुंग्या येणे सुरू होते.

मानसिक क्षमतेवर परिणाम

मेंदूच्या नसा कमकुवत झाल्यामुळे याचा आपल्या मानसिक क्षमतेवरही म्हणजेच विचार करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. यामुळे काही वेळा स्मरणशक्तीवरही प्रभावीत होत असते. यामुळे व्यक्तीला गोष्टी लक्षात ठेवणे आणि बोलणेदेखील कठीण होऊ शकते. याशिवाय, बोलण्यातल्या गोंधळाचाही संबंध मेंदूच्या नसांच्या कमकुवतपणाशी असतो. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.

संबंधीत बातम्या :

Papaya side effects : नंतर पश्चापात करण्यापेक्षा आधीच पपईचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या! 

Hair Fall : केस गळण्याच्या समस्या मागे जास्त एक्सरसाइज करणे हे कारण तर नाही ना कारणीभूत?, जाणून घ्या या मागील इंटरेस्टिंग माहिती

PHOTO | कानामध्ये मळ जमा झाला आहे तर करू नका चिंता, या घरगुती उपचाराने सहजरीत्या काढा कानातील मळ!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.