AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण

ताण आणि तणावाचे अलिकडे प्रमाण वाढलेले आहे. ताण आणि तणावातूनच अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळत असते. एका नव्या अभ्यासात रोजची छोटीशी चूकच आपल्याला संकटाकडे नेत असल्याचे उघड झाले आहे.

ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
Dehydration Raises Stress
| Updated on: Sep 03, 2025 | 8:58 PM
Share

आजच्या जमान्यात प्रत्येक व्यक्तीला ताण-तणावांना ( Stress ) सामोरे जावे लागत आहे. कामाच्या ठिकाणापासून घरातला ताण सहन करावा लागत आहे. ताण आणि तणाव आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आणि हळूहळू अनेक गंभीर आजारांना तो निमंत्रण देत आहे. असे मानले जात होते की कामाचा दबाव, नात्यांतील अडचणी, आर्थिक आणि सामाजिक समस्या लोकांच्या तणावाची पातळी वाढवत आहेत. परंतू नव्या अभ्याासात आश्चर्यकारक आणि धक्कादायक तथ्ये सामोरी आली आहेत.अत्यंत साधी वाटणारी रोजच्या दैनंदिन जीवनातील छोटीशी चूक तुम्हाला अनेक गंभीर आजार देऊ शकते..काय आहे हे संशोधन…

इंग्लंडच्या जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी डीहायड्रेशन आणि तणाव यासंदर्भात एक स्टडी केला आहे. यात आश्चर्यकारक उघड झाले आहे की कमी पाणी पिण्याने देखील ताण वाढू शकतो. शरीरात तरल पदार्थ कमी झाल्यानंतर वेगाने तणावाची पातळी वाढते. हलका डीहाड्रेशन देखील शरीरातील तणावाचे हार्मोन्स कोर्टीसोलची पातळी वाढवू शकतात. संशोधनात उघड झाले आहे की रोज १.५ लिटरहून कमी पाणी पिणाऱ्या लोकांना तणावाच्या दरम्यान कोर्टिसोलच्या पातळीत ५० टक्क्यांची वाढ दिसली. बराच काळ कोर्टिसोलची पातळी वाढल्याने हृदयाचे आजार, डायबिटीज आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढू शकतो.

कोर्टिसोलची पातळी खूप काळासाठी वाढणे धोकादायक

रिसर्च करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की आपण सर्व तणावाला झोप, एक्सरसाईज वा मेडिटेशनद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू कमी पाणी पिण्याची छोटीसी सवय तणावाला वेगाने वाढवते. हायड्रेशन केवळ आपली तहान भागवण्यासाठी गरजेचे नाही, तर आपल्या मनाला शांत करण्यासाठी मदत करते. संशोधकांनी शरीरातील प्रमुख तणाव हार्मोन कोर्टिसोलवर तरल पदार्थांच्या सेवनाचा प्रभावाची चाचणी केली. तेव्हा त्यांना आढळले की जे लोक १.५ लिटरपेक्षा कमी द्रव पदार्थ पितात , त्यांच्यात तणावग्रस्त झाल्यानंतर कोर्टिसोलमधील वाढ पुरेसे पाणी पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ५० टक्के जास्त होती. कोर्टिसोल हे संपूर्णपणे वाईट हार्मोन्स नाही. हे शरीरास तात्काळ धोक्यापासून प्रतिक्रीया देण्यास मदत करते. परंतू जर कोर्टिसोलची पातळी खूप मोठ्या काळासाठी वाढलेली राहीली तर ते शरीरास नुकसान पोहचवू शकते.

महिला आणि पुरुषांनी किती पाणी प्यावे –

या अभ्यासाचे प्रमुख ऑथर प्रोसेसर नी वॉल्श यांच्या मते कोर्टिसोल शरीराचा मुख्य स्ट्रेस हार्मोन्स आहे. आणि तणावाच्या प्रति वाढलेली कोर्टिसोलची पातळी हार्ट डिसिज, डायबिटीज आणि डिप्रेशनच्या वाढत्या जोखीमेशी जुडलेली असते. याहून आश्चर्याची बाब कमी पाणी पिणाऱ्यांना स्वत: त्यांना जास्त तहानलागल्याचे वाटले नाही जेवढे जास्त पाणी पिणाऱ्यांना ते तहानलेले वाटले. कमी पाणी पिणाऱ्यात डीहायड्रेशनचा एकमेव संकेत त्यांच्या युरीनमध्ये पाहायला मिळाला. कारण त्यांची युरीन कंसंट्रेट होती. त्यामुळे आपण केवळ तहानेवर विसंबून आपल्याला किती पाण्याची गरज आहे हे ठरवू शकत नाही. महिलांनी दरदिवशी सुमारे २ लिटर आणि पुरुषांनी २.५ लिटर पाणी प्यायला हवे. तसेच पाण्यासोबत चहा, कॉफी आणि अन्य पेयांचा देखील यात समावेश करता येईल.फळ आणि भाज्यांचेही यात योगदान असते.

बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा.
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा.
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?.
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान.