AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण

ताण आणि तणावाचे अलिकडे प्रमाण वाढलेले आहे. ताण आणि तणावातूनच अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळत असते. एका नव्या अभ्यासात रोजची छोटीशी चूकच आपल्याला संकटाकडे नेत असल्याचे उघड झाले आहे.

ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
Dehydration Raises Stress
| Updated on: Sep 03, 2025 | 8:58 PM
Share

आजच्या जमान्यात प्रत्येक व्यक्तीला ताण-तणावांना ( Stress ) सामोरे जावे लागत आहे. कामाच्या ठिकाणापासून घरातला ताण सहन करावा लागत आहे. ताण आणि तणाव आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आणि हळूहळू अनेक गंभीर आजारांना तो निमंत्रण देत आहे. असे मानले जात होते की कामाचा दबाव, नात्यांतील अडचणी, आर्थिक आणि सामाजिक समस्या लोकांच्या तणावाची पातळी वाढवत आहेत. परंतू नव्या अभ्याासात आश्चर्यकारक आणि धक्कादायक तथ्ये सामोरी आली आहेत.अत्यंत साधी वाटणारी रोजच्या दैनंदिन जीवनातील छोटीशी चूक तुम्हाला अनेक गंभीर आजार देऊ शकते..काय आहे हे संशोधन…

इंग्लंडच्या जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी डीहायड्रेशन आणि तणाव यासंदर्भात एक स्टडी केला आहे. यात आश्चर्यकारक उघड झाले आहे की कमी पाणी पिण्याने देखील ताण वाढू शकतो. शरीरात तरल पदार्थ कमी झाल्यानंतर वेगाने तणावाची पातळी वाढते. हलका डीहाड्रेशन देखील शरीरातील तणावाचे हार्मोन्स कोर्टीसोलची पातळी वाढवू शकतात. संशोधनात उघड झाले आहे की रोज १.५ लिटरहून कमी पाणी पिणाऱ्या लोकांना तणावाच्या दरम्यान कोर्टिसोलच्या पातळीत ५० टक्क्यांची वाढ दिसली. बराच काळ कोर्टिसोलची पातळी वाढल्याने हृदयाचे आजार, डायबिटीज आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढू शकतो.

कोर्टिसोलची पातळी खूप काळासाठी वाढणे धोकादायक

रिसर्च करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की आपण सर्व तणावाला झोप, एक्सरसाईज वा मेडिटेशनद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू कमी पाणी पिण्याची छोटीसी सवय तणावाला वेगाने वाढवते. हायड्रेशन केवळ आपली तहान भागवण्यासाठी गरजेचे नाही, तर आपल्या मनाला शांत करण्यासाठी मदत करते. संशोधकांनी शरीरातील प्रमुख तणाव हार्मोन कोर्टिसोलवर तरल पदार्थांच्या सेवनाचा प्रभावाची चाचणी केली. तेव्हा त्यांना आढळले की जे लोक १.५ लिटरपेक्षा कमी द्रव पदार्थ पितात , त्यांच्यात तणावग्रस्त झाल्यानंतर कोर्टिसोलमधील वाढ पुरेसे पाणी पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ५० टक्के जास्त होती. कोर्टिसोल हे संपूर्णपणे वाईट हार्मोन्स नाही. हे शरीरास तात्काळ धोक्यापासून प्रतिक्रीया देण्यास मदत करते. परंतू जर कोर्टिसोलची पातळी खूप मोठ्या काळासाठी वाढलेली राहीली तर ते शरीरास नुकसान पोहचवू शकते.

महिला आणि पुरुषांनी किती पाणी प्यावे –

या अभ्यासाचे प्रमुख ऑथर प्रोसेसर नी वॉल्श यांच्या मते कोर्टिसोल शरीराचा मुख्य स्ट्रेस हार्मोन्स आहे. आणि तणावाच्या प्रति वाढलेली कोर्टिसोलची पातळी हार्ट डिसिज, डायबिटीज आणि डिप्रेशनच्या वाढत्या जोखीमेशी जुडलेली असते. याहून आश्चर्याची बाब कमी पाणी पिणाऱ्यांना स्वत: त्यांना जास्त तहानलागल्याचे वाटले नाही जेवढे जास्त पाणी पिणाऱ्यांना ते तहानलेले वाटले. कमी पाणी पिणाऱ्यात डीहायड्रेशनचा एकमेव संकेत त्यांच्या युरीनमध्ये पाहायला मिळाला. कारण त्यांची युरीन कंसंट्रेट होती. त्यामुळे आपण केवळ तहानेवर विसंबून आपल्याला किती पाण्याची गरज आहे हे ठरवू शकत नाही. महिलांनी दरदिवशी सुमारे २ लिटर आणि पुरुषांनी २.५ लिटर पाणी प्यायला हवे. तसेच पाण्यासोबत चहा, कॉफी आणि अन्य पेयांचा देखील यात समावेश करता येईल.फळ आणि भाज्यांचेही यात योगदान असते.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.