AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात ‘ही’ 4 ड्रायफ्रूट्स दूर करतील व्हिटॅमिन डीची कमतरता, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Dry Fruits for Vitamin D: योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. अनेक ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. कोणत्या ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करावा हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हिवाळ्यात 'ही' 4 ड्रायफ्रूट्स दूर करतील व्हिटॅमिन डीची कमतरता, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुका मेवा खरेदी करतो. यासोबतच पाकिस्तानकडून ताजी फळेही विकत घेतली जातात.
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Dec 24, 2024 | 2:11 PM
Share

आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी समतोल राखणे गरजेचे आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे, या दिवसात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता भासू लागते. व्हिटॅमिन डीचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी आपल्याला रोजचे सूर्यप्रकाश पुरेसे असते. हिवाळाच्या दिवसंमध्ये या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात.यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश करा.

आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा, आळसपणा, हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. अशा वेळी व्हिटॅमिन डीचे प्रमाण पूर्ण केले पाहिजे. हिवाळ्यात त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

अंजीर खा

निरोगी आरोग्यासाठी आपण आपल्या डाएट मध्ये ड्रायफ्रूटचे समावेश करत असतो. अंजीर व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. हाडांच्या मजबुतीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. सुकवलेले अंजीरचे सेवन केल्यास शरीरातील हाडे आणि दातांना फायदा होतो.

खजूर

खजूरमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. हे शरीरातील उर्जेची पातळी समतोल राखण्यास मदत करते. खजूर देखील एक नैसर्गिक स्वीटनर आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज 2 ते 3 खजूरचे सेवन करा.

जर्दाळू

जर्दाळूचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी खूप निरोगी असते, कारण हे जर्दाळू व्हिटॅमिन डी ने समृद्ध असतात. व्हिटॅमिन डीसोबतच लोह आणि पोटॅशियमही यात असते. तुम्ही जर नियमित जर्दाळूचे सेवन केल्यास हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

बदाम

आपल्या सर्वांना माहीतच असेल की, भिजवलेले बदाम रोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच बदामाचे सेवन केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी असते. बदामामध्ये फायबर, प्रथिने, तांबे आणि मॅग्नेशियम देखील असते. हे सर्व पोषक घटक हाडे आणि स्नायू मजबूत करण्याचे काम करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार