AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या

उन्हाळा सुरू होताच गरमी वाढते आणि शारीरिक समस्यांमध्येही वाढ होताना दिसते. घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ खाऊन पोटाचे आरोग्या शांत ठेवता येते.

Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 04, 2023 | 3:14 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळा आला की अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात तापमान (heat) वाढले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे डिहायड्रेशन (dehydration), उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अशक्तपणा येणे आदी आजार होऊ लागतात. तसेच उन्हाळ्यात मसालेदार किंवा तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराची पचनक्रियाही बिघडू लागते. रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणूंचा धोका वाढतो. या कारणांमुळे देखील लोकांना पोटदुखी, गॅस, पोटात इन्फेक्शन, ॲसिडिटी, लूज मोशन अशा पचनाशी संबंधित समस्या तसेच उन्हाळ्यात उलट्या होणे, असा त्रास होण्यास सुरुवात होते.

उन्हाळ्यात ॲसिडीटी आणि गॅसची समस्या बहुतेकांना होतेच. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायले पाहिजे अशी शिफारस आरोग्य तज्ञ करतात. त्यामुळे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकू शकेल. तसेच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवणार नाही.

मात्र, पाण्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात काही गोष्टींचे सेवन फायदेशीर ठरते. असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते, तसेच शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यासाठी फायदेशीर पदार्थ

काकडी-पपई

प्रत्येक ऋतूमध्ये ताज्या फळांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढते तेव्हा काकडी आणि पपई खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची कमतरता पूर्ण होते. पपई आणि काकडीत भरपूर फायबर आढळते. याच्या सेवनाने पोटाला थंडावा मिळतो. पित्ताचे संतुलन राखून ते शरीराचा पीएचही निरोगी ठेवते. उन्हाळ्यात गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असली तरी काकडी आणि पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

नारळ पाणी

नारळ पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वं असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाचा पारा चढला की नारळपाणी प्यायल्याने शरीराला अंतर्गत गारवाही मिळतो. नारळाच्या पाण्यात बॉडी डिटॉक्स करण्याचे गुणधर्म देखील आहेत. यात फायबरचा दर्जाही असतो, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

खरबूज

खरबूज हे उन्हाळ्यातील हंगामी फळ आहे. खरबुजाचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे. खरबुजामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर ॲसिड रिफ्लेक्स गुणधर्म आहेत. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे आवश्यक घटक मिळतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता देखील खरबूज दूर करते.

केळं

उष्मा वाढल्यावर एक पिकलेले केळं रोज खावे. केळ्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. केळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरचे गुणधर्म असतात. फायबर पचनाच्या समस्या दूर करते, तर पोटॅशियम ॲसिडिटी नियंत्रित करते.

दही किंवा गार दूध

उन्हाळ्यात दररोज दही खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये भरपूर फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते. ॲसिडिटी आणि अपचनाची समस्याही दह्याच्या सेवनाने दूर होते. दुसरीकडे थंड दूध प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे जळजळ, अॅसिडिटीचा त्रास होत नाही. थंड दूध पिणे म्हणजे साधे दूध पिणे, फ्रीजमध्ये ठेवलेले दूध नव्हे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.