Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या

उन्हाळा सुरू होताच गरमी वाढते आणि शारीरिक समस्यांमध्येही वाढ होताना दिसते. घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ खाऊन पोटाचे आरोग्या शांत ठेवता येते.

Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली : उन्हाळा आला की अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात तापमान (heat) वाढले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे डिहायड्रेशन (dehydration), उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अशक्तपणा येणे आदी आजार होऊ लागतात. तसेच उन्हाळ्यात मसालेदार किंवा तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराची पचनक्रियाही बिघडू लागते. रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणूंचा धोका वाढतो. या कारणांमुळे देखील लोकांना पोटदुखी, गॅस, पोटात इन्फेक्शन, ॲसिडिटी, लूज मोशन अशा पचनाशी संबंधित समस्या तसेच उन्हाळ्यात उलट्या होणे, असा त्रास होण्यास सुरुवात होते.

उन्हाळ्यात ॲसिडीटी आणि गॅसची समस्या बहुतेकांना होतेच. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायले पाहिजे अशी शिफारस आरोग्य तज्ञ करतात. त्यामुळे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकू शकेल. तसेच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवणार नाही.

मात्र, पाण्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात काही गोष्टींचे सेवन फायदेशीर ठरते. असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते, तसेच शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

उन्हाळ्यासाठी फायदेशीर पदार्थ

काकडी-पपई

प्रत्येक ऋतूमध्ये ताज्या फळांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढते तेव्हा काकडी आणि पपई खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची कमतरता पूर्ण होते. पपई आणि काकडीत भरपूर फायबर आढळते. याच्या सेवनाने पोटाला थंडावा मिळतो. पित्ताचे संतुलन राखून ते शरीराचा पीएचही निरोगी ठेवते. उन्हाळ्यात गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असली तरी काकडी आणि पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

नारळ पाणी

नारळ पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वं असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाचा पारा चढला की नारळपाणी प्यायल्याने शरीराला अंतर्गत गारवाही मिळतो. नारळाच्या पाण्यात बॉडी डिटॉक्स करण्याचे गुणधर्म देखील आहेत. यात फायबरचा दर्जाही असतो, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

खरबूज

खरबूज हे उन्हाळ्यातील हंगामी फळ आहे. खरबुजाचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे. खरबुजामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर ॲसिड रिफ्लेक्स गुणधर्म आहेत. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे आवश्यक घटक मिळतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता देखील खरबूज दूर करते.

केळं

उष्मा वाढल्यावर एक पिकलेले केळं रोज खावे. केळ्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. केळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरचे गुणधर्म असतात. फायबर पचनाच्या समस्या दूर करते, तर पोटॅशियम ॲसिडिटी नियंत्रित करते.

दही किंवा गार दूध

उन्हाळ्यात दररोज दही खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये भरपूर फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते. ॲसिडिटी आणि अपचनाची समस्याही दह्याच्या सेवनाने दूर होते. दुसरीकडे थंड दूध प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे जळजळ, अॅसिडिटीचा त्रास होत नाही. थंड दूध पिणे म्हणजे साधे दूध पिणे, फ्रीजमध्ये ठेवलेले दूध नव्हे.

Non Stop LIVE Update
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.