AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health News : आयुर्वेदिक उपचारात त्रिफळा रामबाण, पण या लोकांसाठी घातक

त्रिफळाचे अनेक फायदे आहेत. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकही शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. पण त्रिफळाचे जितके फायदे आहेत तितकेच ते हानिकारकही आहे. काहीवेळा त्रिफळाचे सेवन शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते.

Health News : आयुर्वेदिक उपचारात त्रिफळा रामबाण, पण या लोकांसाठी घातक
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 23, 2023 | 11:38 PM
Share

बहुतेक लोक त्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करतात. आयुर्वेदातही चांगले आरोग्य ठेवण्यासाठी अनेक योग्य मार्ग सांगितले आहेत. शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. यापैकी एक म्हणजे त्रिफळा. त्रिफळा हे पोटाच्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. आवळा, हरड, जायफळ अशा अनेक वनौषधींपासून बनवलेल्या त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्म असतात.

त्रिफळाचे अनेक फायदे आहेत. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकही शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. पण त्रिफळाचे जितके फायदे आहेत तितकेच ते हानिकारकही आहे. काहीवेळा त्रिफळाचे सेवन शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या लोकांनी त्रिफळा घेणे टाळावे.

मधुमेह असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी

मधुमेह रोखण्याचे गुणधर्म त्रिफळामध्ये आहेत. पण जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांनी त्रिफळाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रिफळा खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास असणार्‍यांना हायपोग्लायसेमियाची समस्या होऊ शकते. त्यामुळे त्रिफळाचे सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

वजन कमी असणारे

ज्या लोकांचे वजन कमी आहे त्यांनी त्रिफळा चूर्ण घेणे टाळावे.  त्रिफळामध्ये असे गुणधर्म आहेत की ते मेटाबॉलिज्म सुधारून पोटाची चरबी कमी करते. त्यामुळे ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी हे चूर्ण घेऊ नये. कारण ते घेतल्याने आणखी वजन कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

पोट बिघडल्यावर खाऊ नका

त्रिफळा हे पोटासाठी रामबाण औषध मानले जाते. पण, पोट बिघडल्यावर कोणीही चुकून त्रिफळा चूर्ण खाऊ नये. कारण या चूर्णमध्यये बद्धकोष्ठता दूर करणारे घटक असतात.

गरोदरपणात हे चूर्ण खाऊ नये

तुम्हाला माहीती आहे का गरोदरपणात त्रिफळा चूर्ण कोणीही चुकूनही खाऊ नये. कारण हे चूर्ण खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो. गरोदरपणात पोटात गॅस तयार होण्याची समस्या निर्माण होते. ती टाळण्यासाठी महिला त्रिफळाचे सेवन करतात. पण असे केल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्रिफळाचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यावरच करा.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा