AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hormonal Imbalance : महिलांनो इकडे लक्ष द्या…. या उपायांच्या मदतीने करा हार्मोन्स संतुलित

जीवनशैलीत बदल झाल्यास त्यामुळे हार्मोनल असंतुलन होते, तसेच त्याचा विविध मार्गांनी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: स्त्रियांमध्ये त्याची वेगवेगळी लक्षणे असतात जी नैसर्गिकरित्या नियंत्रित करता येऊ शकते.

Hormonal Imbalance : महिलांनो इकडे लक्ष द्या.... या उपायांच्या मदतीने करा हार्मोन्स संतुलित
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 31, 2023 | 2:01 PM
Share

नवी दिल्ली – निरोगी जीवनशैलीसाठी निरोगी शरीर आणि निरोगी मन हे दोन्ही आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने चांगला आहार (food) सेवन करणे, नियमित व्यायाम करणे (exercise) आणि तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल झाल्यास त्यामुळे हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance) होते, तसेच त्याचा विविध मार्गांनी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल असंतुलन केवळ महिलांमध्येच नव्हे तर पुरूषांमध्येही होते. पण थोड्या वेगळ्या अंतःस्रावी प्रणालीच्या उपस्थितीमुळे स्त्रियांमध्ये हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या (natural remedies) हार्मोन्सचे संतुलन कसे राखावे हे जाणून घेऊया.

स्त्रियांसाठी हार्मोनल संतुलन राखणे महत्वाचे का आहे?

हार्मोन्स आपल्या शरीरात केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात, जे भूक, वजन आणि मूड नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. पीरियड सायकल, ओव्ह्युलेशन, फलित नसलेल्या अंड्यांचे संरक्षण आणि गर्भधारणेसाठी स्त्रीचे शरीर तयार करणे यामध्ये हार्मोन्सची भूमिका महत्वाची असते. हार्मोनल असंतुलन आपल्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते आणि स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकते.

हार्मोनल असंतुलनाची लक्षणे

जीवनशैलीत होणारे बदल आणि आपल्या आहारातील निवडी हे हार्मोनल असंतुलनाचे मुख्य कारण आहेत, त्यामुळे आपल्या तणावातही भर पडते. परंतु हार्मोनल असंतुलनाचा आव्हानात्मक भाग म्हणजे ची लक्षणे ओळखणे. मूड स्विंग, अनियमित मासिक पाळी, नैराश्य आणि चिंता, तसेच केस गळणे, अपुरी झोप, पुरळसारख्या त्वचेच्या समस्या आणि थकवा यांचा त्या लक्षणांमध्ये समावेश असू शकतो.

नैसर्गिकरित्या हार्मोन्स कसे संतुलित करावे ?

1) योग्य आहार

असंतुलित आहार आणि पोषणाचा अभाव असेल तर त्याने काम होणार नाही. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. निरोगी आहारामध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे, तसेच शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट आणि चरबी यासारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचा समावेश असावा. अयोग्य आहारामुळे वजन वाढणे किंवा कमी होण्याची शक्यता आहे. जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI)असलेल्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होण्याची शक्यता जास्त असते.

2) व्यायाम करा

चांगले आरोग्य राखणे हे योग्य आणि संतुलित आहार आणि योग्य व्यायामावर अवलंबून असते. व्यायाम केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे कॅलरी बर्न करणे सोपे होते आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन राखण्यास देखील मदत होते.

3) ताण घेणे कमी करा

तणावामुळे कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन बाहेर पडते, ते शरीराला थोड्या प्रमाणात आवश्यक असते. परंतु जेव्हा तणावामुळे जास्त प्रमाणात कॉर्टिसॉल सोडले जाते तेव्हा ते हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरते. यामुळे लठ्ठपणा, निद्रानाश आणि थकवा यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. स्ट्रेस हार्मोन्स वाढल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढू शकतो.

4) हाय केमिकल सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा

एंडोक्राइन डिस्रप्टिव्ह केमिकल (EDCs) शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्वचेद्वारे सहजपणे शोषली जातात. EDCs प्रजननक्षमतेवर परिणाम करतात, तसेच कॅन्सर आणि पुनरुत्पादक अवयवांमध्ये विकृती निर्माण करतात. जरी कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये EDC ची पातळी कमी असली तरीही, यामुळे हार्मोनल असंतुलन होते, म्हणून त्वचेसाठी केमिकलमुक्त सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा सल्ला दिला जातो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.