AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heat Stroke : रणरणत्या उन्हामुळे वैतागलात ? हे पदार्थ खाल तर नाही होणार हीट स्ट्रोकचा त्रास

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आहार योग्य असावा. आहारातील खाद्यपदार्थांची योग्य निवड करणे देखील खूप महत्वाचे आहे.

Heat Stroke : रणरणत्या उन्हामुळे वैतागलात ? हे पदार्थ खाल तर नाही होणार हीट स्ट्रोकचा त्रास
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 04, 2023 | 12:33 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्यात उष्माघाताचा (heat stroke) त्रास होणे, ही समस्या सामान्य आहे. उन्हात राहणाऱ्या किंवा ऊन (hot temperature) सहन करता येत नाही अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, लूज मोशन, मळमळ (lose motion, headache) यासारख्या समस्या निर्माण होतात. आता उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी उष्माघाताची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी फक्त काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अशा खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्याचे सेवन केल्याने उष्माघात टाळता येऊ शकतो.

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे ठरते फायदेशीर

1) काकडी जरूर खा

जर तुम्ही उन्हात प्रवास करत असाल किंवा जास्त वेळ उन्हात काम करत असाल तर तुमच्या आहारात सलाडच्या स्वरूपात काकडीचा समावेश करू शकता. काकडी ही शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशिअम आणि मॅंगनीजसारखे पोषक घटक आढळतात. तसेच शरीराला पाण्याचा पुरवठा होतो. पचनसंस्थाही चांगली राहते.

2) दही खाणे ठरते फायदेशीर

दही शरीरात प्रोबायोटिकचे काम करते. यात लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. ताक किंवा रायत्याच्या स्वरूपातही दह्याचे सेवन करता येते. यामध्ये काही सॅलड्सचाही समावेश करता येईल. लस्सी पिणे देखील फायदेशीर आहे.

3) कांदा खा

उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कांदा खूप महत्त्वाचा आहे. कांदा सलाडच्या स्वरुपात खाऊ शकता. कांदा हा शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही. तुम्ही दही आणि कांद्याची कोशिंबीर बनवून खाऊ शकता.

4) पुदीन्याचे सेवन ठरते लाभदायक

पुदीन्यामध्ये मेन्थॉल असते. हे उष्माघातापासून संरक्षण करून शरीराला थंड ठेवते. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही व उष्माघाताचा त्रास होत नाही.

5) बेळफळाचे सरबत प्यावे

उन्हाळ्यात बेल फळांचीही बाजारात विक्री सुरू होते. बेलमध्ये भरपूर फायबर असते. ते आतड्यांना फिट करून पचनसंस्था मजबूत करते. त्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ