AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heat Stroke : रणरणत्या उन्हामुळे वैतागलात ? हे पदार्थ खाल तर नाही होणार हीट स्ट्रोकचा त्रास

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आहार योग्य असावा. आहारातील खाद्यपदार्थांची योग्य निवड करणे देखील खूप महत्वाचे आहे.

Heat Stroke : रणरणत्या उन्हामुळे वैतागलात ? हे पदार्थ खाल तर नाही होणार हीट स्ट्रोकचा त्रास
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 04, 2023 | 12:33 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्यात उष्माघाताचा (heat stroke) त्रास होणे, ही समस्या सामान्य आहे. उन्हात राहणाऱ्या किंवा ऊन (hot temperature) सहन करता येत नाही अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, लूज मोशन, मळमळ (lose motion, headache) यासारख्या समस्या निर्माण होतात. आता उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी उष्माघाताची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी फक्त काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अशा खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्याचे सेवन केल्याने उष्माघात टाळता येऊ शकतो.

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे ठरते फायदेशीर

1) काकडी जरूर खा

जर तुम्ही उन्हात प्रवास करत असाल किंवा जास्त वेळ उन्हात काम करत असाल तर तुमच्या आहारात सलाडच्या स्वरूपात काकडीचा समावेश करू शकता. काकडी ही शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशिअम आणि मॅंगनीजसारखे पोषक घटक आढळतात. तसेच शरीराला पाण्याचा पुरवठा होतो. पचनसंस्थाही चांगली राहते.

2) दही खाणे ठरते फायदेशीर

दही शरीरात प्रोबायोटिकचे काम करते. यात लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. ताक किंवा रायत्याच्या स्वरूपातही दह्याचे सेवन करता येते. यामध्ये काही सॅलड्सचाही समावेश करता येईल. लस्सी पिणे देखील फायदेशीर आहे.

3) कांदा खा

उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कांदा खूप महत्त्वाचा आहे. कांदा सलाडच्या स्वरुपात खाऊ शकता. कांदा हा शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही. तुम्ही दही आणि कांद्याची कोशिंबीर बनवून खाऊ शकता.

4) पुदीन्याचे सेवन ठरते लाभदायक

पुदीन्यामध्ये मेन्थॉल असते. हे उष्माघातापासून संरक्षण करून शरीराला थंड ठेवते. त्यामुळे उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही व उष्माघाताचा त्रास होत नाही.

5) बेळफळाचे सरबत प्यावे

उन्हाळ्यात बेल फळांचीही बाजारात विक्री सुरू होते. बेलमध्ये भरपूर फायबर असते. ते आतड्यांना फिट करून पचनसंस्था मजबूत करते. त्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?