AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

75 वर्षांनंतर असाही योगागोग, फाळणीत विभक्त झालेला शीख भाऊ करतारपूरमध्ये मुस्लिम बहिणीला भेटला

अमरजित सिंह म्हणाले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले त्यांचे खरे पालक पाकिस्तानात आहेत आणि ते मुस्लिम आहेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वतःची समजूत काढली.

75 वर्षांनंतर असाही योगागोग, फाळणीत विभक्त झालेला शीख भाऊ करतारपूरमध्ये मुस्लिम बहिणीला भेटला
करतारपूर Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 11, 2022 | 2:34 PM
Share

करतारपूर,  एखाद्या चित्रपटाला शोभून दिसेल अशी घटना पाकिस्तानच्या करतारपूर (Pakistan Kartarpur) येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे घडली आहे. भारतातील जालंधर येथे राहणारे अमरजित सिंह फाळणीच्या वेळी 1947 साली कुटुंबापासून विभक्त झाले होते. त्यानंतर ते  करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे त्यांच्या पाकिस्तानी मुस्लिम बहिणीला (Muslim Sister) भेटले. हा क्षण दोघांसाठीही अकल्पित होताच शिवाय बहीण भावाच्या या भेटीने उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते. सिंह यांचे मुस्लिम पालक फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते तर ते आणि त्यांची बहीण भारतात मागे राहिले होते. बुधवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुरुद्वारा दरबार साहिब येथे व्हीलचेअरवर बसलेले सिंह त्यांची मुस्लिम बहीण कुलसूम अख्तर यांना भेटले.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सिंह आपल्या बहिणीला भेटण्यासाठी व्हिसा घेऊन वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहोचले. 65 वर्षीय कुलसूमला तिचा भाऊ अमरजित सिंहला भावना अनावर झाल्या. बराच वेळ ते फक्त एकमेकांना मिठी मारून रडत होते.

भावाला भेटण्यासाठी फैसलाबादहून करतारपूरला आली बहीण

कुलसूम आणि मुलगा शहजाद अहमद आणि कुटुंबातील इतर सदस्य तिच्या भावाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या  फैसलाबादहून करतारपूरला पोहोचले होते. वृत्तपत्राशी बोलताना कुलसूमने सांगितले की, त्यांचे आई-वडील 1947 मध्ये जालंधरच्या उपनगरातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते, तर त्यांचा भाऊ आणि एक बहीण तिथेच राहिले होते. कुलसूम म्हणाली की, तिचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. फाळणीच्या वेळी तिचा भाऊ आणि बहीण भारतात सुटल्याची गोष्ट त्या तिच्या आईकडून ऐकत असत.  आयुष्यात परत त्यांना तिच्या भाव बहिणीला भेटता येईल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया कुलसुम यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सरदार दारा सिंह हे त्यांच्या वडिलांचे एक मित्र भारतातून पाकिस्तानात आले आणि त्यांनाही भेटले. त्यांनी सांगितले की, यावेळी त्यांच्या आईने सरदार दारा सिंह यांना भारतात सोडल्या गेलेल्या मुला आणि मुलीबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या गावाचे नाव आणि इतर माहितीही दारा सिंगला दिली.

 व्हॉट्स ॲपवर साधला संपर्क

पाकिस्तानमध्ये कुलसुम यांना भेटल्यानंतर दारा सिंह यांनी त्यांच्या आईला सांगितले की त्यांचा मुलगा जिवंत आहे, परंतु त्यांची मुलगी मरण पावली आहे. कुलसूमच्या म्हणण्यानुसार, दारा सिंहने आपल्या आईला सांगितले की, त्यांच्या मुलाचे नाव अमरजित सिंग आहे, ज्याला 1947 मध्ये एका शीख कुटुंबाने दत्तक घेतले होते. आपल्या भावाची माहिती मिळाल्यानंतर कुलसूमन यांनी सिंह यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला आणि नंतर भेटण्याचा निर्णय घेतला.

माझ्यासाठी हा धक्का होता…  अमरजित सिंह

अमरजित सिंह म्हणाले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले त्यांचे खरे पालक पाकिस्तानात आहेत आणि ते मुस्लिम आहेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वतःची समजूत काढली.  फाळणीच्या काळात स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबियांपासून आहेकांची ताटातूट झाली होती. सिंग म्हणाले की, मला नेहमी आपल्या खऱ्या बहिणी आणि भावांना भेटायचे होते. आपले तीन भाऊ जिवंत असल्याचे कळताच आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जर्मनीत असलेल्या एका भावाचे निधन झाले आहे.

Follow Us
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....