तारिक रहमान पीएम होताच, चीनी ड्रॅगनची वाकडी चाल, भारताला मोठा झटका ?

नुकत्याच झालेल्या बांगलादेशच्या निवडणुकांना लोकशाहीचा विजय चीनच्या राजदूतांनी गुणगान केले आहे. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय भेटी सुरूच राहतील असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल चीनने तारिक रहमान यांचे अभिनंदन केले आहे.

तारिक रहमान पीएम होताच, चीनी ड्रॅगनची वाकडी चाल, भारताला मोठा झटका  ?
Chinese dragon
| Updated on: Feb 22, 2026 | 10:12 PM

चीनी ड्रॅगनने पुन्हा एकदा भारतास झटका देणारी चाल खेळली आहे. ड्रॅगनने बांगलादेशात तारिक रहमान यांनी पदभार सांभाळताच तिस्ता रिव्हर प्रोजेक्ट संदर्भात पुन्हा एकदा बांगलादेशाचे कान फुंकले आहेत. बांगलादेशात चीनी राजदूत याओ वेन यांनी रविवारी सांगितले की चीन आणि बांगलादेश तीस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनर्संचयित प्रकल्पावर बरीच वर्षे बोलणी करत आहेत  आणि या प्रकल्पावर पुन्हा एकदा काम सुरु व्हावे असे चीनने बांगलादेशला म्हटले आहे. चीनी राजदूत याओ व्हेन यांनी परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही पुढी सोडली आहे.

चीनी पीएमच्या तारिक रहमान यांना शुभेच्छा

याशिवाय चीनचे राजदूताने अलिकडे बांगलादेशात झालेल्या निवडणूकांना लोकशाहीचा विजय म्हटले आहे. दोन्ही देशात मैत्रीचा धागा कायम राहिल असेही ते म्हणाले. १७ फेब्रुवारी २०२६ च्या स्टेट काऊन्सिलचे चीनी पंतप्रधान ली कियांग यांनी तारिक रहमान यांना पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

बांगलादेश निवडणूकीनंतर काय म्हणाला चीन?

एका संदेशात चीनने लिहिलेय आहे की दोन्ही शेजारील देश शेजारी आहेत. त्यांच्यात बरीच काळ मैत्री आहे.आणि ते कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक कोऑपरेटिव पार्टनर आहेत, दोन्ही देशात मैत्रीचे नाते जुने आहे. ली कियांग यांनी म्हटले की मैत्रीच्या मागे गेल्या ५१ वर्षात डिप्लोमेटिक नाती बनवण्यानंतर चीन आणि बांगलादेश नेहमीच एकमेकांचा सन्मान केला आणि एकमेकांच्या सोबत योग्य व्यवहार केला. यामुळे दोन्ही देशात देवाण-घेवाण वाढली आहे.

कोणत्या योजनांवर ड्रॅगनची नजर ?

ली कियांग यांनी पंतप्रधान तारिक रहमान सोबत अनेक वर्षांच्या संबंधांना आपण पुढे वाढवणार असून सर्वच सेक्टरमध्ये हाय क्लालिटी बेल्ट एण्ड रोड सहकार्य, देवाण-घेवाण वाढवणे, चीन- बांगलादेश कॉम्प्रिहेंसिव्ह स्ट्रॅटेजिक कोऑपरेटिव्ह पार्टनरशिप एका नव्या पातळीवर घेऊन नेण्यासाठी काम करायला तयार आहेत.त्यामुळे दोन्ही देशांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा.

तीस्ता प्रोजेक्टवर चीनकडून गुंतवणूक हवी

तीस्ता नदीवरील या या धरण योजनेवर बांगलादेश सुमारे एक बिलियन डॉलर खर्च करणार आहे. ज्याचा सुमारे ८५ टक्के चीनकडून कर्जाऊ घेणार आहेत. त्यामुळे भारतासाठी एक झटका असणार आहे. कारण ज्या जागी हे धरण प्रकल्प होणार आहे, ती जागा भारताच्या चिकन नेकच्या २० ते ३० किमीजवळ आहे. जर या ठिकाणी काही बांधकाम झाले तर चीनपासून भारताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.