AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात 5G मध्ये चीनची एन्ट्री झाली असती तर लेबनानसारखा हल्ला शक्य होता…पण त्या निर्णयामुळे…

india 5g technology: भारत स्वत:च आपले 5जी तंत्रज्ञान विकसित करत आहे. ते तंत्रज्ञान अतिशय प्रगत असणार आहे. दीर्घकाळ देशाच्या सुरक्षेसाठी हे फायदेशीर असणार आहे. विदेशातून येणाऱ्या तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर भारत बंद करणार आहे. जसे सीसीटीव्ही कॅमेरे चीनमधूनच येत असतात. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येते.

भारतात 5G मध्ये चीनची एन्ट्री झाली असती तर लेबनानसारखा हल्ला शक्य होता...पण त्या निर्णयामुळे...
india 5g technology
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 18, 2024 | 2:40 PM
Share

Lebanon Pager Explosions: लेबनान आणि सीरिया 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता हादरले. एकामागे एक साखळी स्फोट या देशांमध्ये सुरु झाले. कधी कोणी विचारही केला नव्हता अशा पेजरच्या माध्यमातून हे साखळी स्फोट झाले. हिजबुल्लाहचे दहशतवादी असलेल्या पेजरमध्येच हे स्फोट झाले. जवळपास पाच हजार स्फोट झाले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला तर 4000 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईराणचे राजदूत मोज्ताबा अमिनी या हल्ल्यात जखमी झाले. त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. या हल्ल्याचा आरोप इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर लावला जात आहे.

अद्याप कोणीही घेतली नाही जबाबदारी

लेबनान आणि सिरियामध्ये झालेले पेजर स्फोट कसे झाले? कोणी केले? याची अधिकृतरित्या कोणीही जबाबदारी घेतली नाही. परंतु आरोप इस्त्रायलवर होत आहे. हे पेजर तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने बनवले असल्याचे म्हटले जाते. परंतु कंपनीकडून नकार दिला जात आहे. हिजबुल्लाह आधुनिक मोबाईल ऐवजी जुने तंत्रज्ञान असलेले पेजर वापरत होती. कारण हिजबुल्लाहच्या अतिरेक्याचा ट्रेस लागू नये? हॅकींग होऊ नये. भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का?

भारताने यासाठीच 5G तंत्रज्ञानामध्ये चीनला येऊ दिले नाही

भारताने यापूर्वीच असे हल्ले रोखण्याची मजबूत व्यवस्था केली आहे. भारत सरकारचे नेहमी पब्लिक कम्युनिकेशन हार्डवेअरवर बारीक लक्ष असते. त्यासाठीच भारताने 5G तंत्रज्ञानामध्ये चीनसारख्या देशांची घुसखोरी होऊ दिली नाही. म्हणजे या क्षेत्रात चीनचे तंत्रज्ञान भारतात येऊ दिले नाही. विदेशी तंत्रज्ञानाचा वापर देशात होऊ नये, हे गरजेचे आहे. विशेषत: शत्रू राष्ट्राचे तंत्रज्ञान देशात येऊ नये, याची काळजी भारताकडून घेतली जाते.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, भारत स्वत:च आपले 5जी तंत्रज्ञान विकसित करत आहे. ते तंत्रज्ञान अतिशय प्रगत असणार आहे. दीर्घकाळ देशाच्या सुरक्षेसाठी हे फायदेशीर असणार आहे. विदेशातून येणाऱ्या तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर भारत बंद करणार आहे. जसे सीसीटीव्ही कॅमेरे चीनमधूनच येत असतात. त्यामुळे सुरक्षा धोक्यात येते.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत