AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमा वादात चीनची चालाखी, थेट भारतात येऊनही आडमुठेपणा, बैठकीनंतर..

भारताने ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले. ब्रिक्सचे सदस्य असलेले देश या परिषदेत दाखल झाले. त्यातच चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्दिपक्षीय बैठक झाली. मात्र, चीनचा चालाखबाजी बघायला मिळाली.

सीमा वादात चीनची चालाखी, थेट भारतात येऊनही आडमुठेपणा, बैठकीनंतर..
Xi Jinping Narendra Modi
| Updated on: Sep 13, 2026 | 11:17 AM
Share

गलवान घाटीच्या वादानंतर चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग तब्बल सात वर्षानंतर भारत दाैऱ्यावर आले आहेत. सात वर्ष भारत आणि चीनमध्ये तणाव बघायला मिळाला. काही दिवसानंतर आता तणाव कमी झाला. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर चीनने भूमिका घेतली. अमेरिकेच्या विरोधात चीन मैदानात उतरला. ब्रिक्स परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष भारतात आहेत. नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात बैठक झाली. सीमा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशात सहमती झाली. मात्र, दोन्ही देशांकडून आलेले विधान विरोधाभास दर्शवत आहेत. चीनने आपल्या विधानात दोन्ही देशातील व्दिपक्षीय संबंध पुढे नेण्याची आणि सीमेच्या मुद्द्यावरून चर्चा करून तोडगा काढण्याबद्दल भाष्य केले. सीमावर्ती भागात शांती ठेऊन दोन्ही बाजूंनी मजबूत प्रगती यावर काम करत असल्याचे चीनने म्हटले. चीनचे थोडक्यात म्हणणे आहे की, सीमावाद मिटण्यापूर्वी संबंध सामान्य ठेवले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोष्टीवर भर दिला की, सीमेवर शांती, स्थिरता आणि व्दिपक्षीय संबंध मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे. भारताने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध आणि दोन्ही देशांच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन निष्पक्ष, योग्य आणि दोन्ही देशांनी एकत्र येऊन वाद मिटवावा. भारताचे स्पष्ट मत आहे की, सीमा संबंधित करार आणि सहमतीचे पूर्णपणे पालन केले पाहिते.

भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. काहींचे म्हणणे आहे की, चीन भारतीय क्षेत्रावर कब्जा करत आहे. आता दोन्ही देशांच्या विधानात फरक दिसत आहे. चीनचे म्हणणे आहे की, सीमा वाद सुरू असतानाही बाकी संबंध आपण व्यवस्थित ठेऊ शकतो. 2020 मधील गलवान झडपेनंतर भारताचे स्पष्ट आहे की, सीमेवर पूर्णपण शांती स्थापित होत नाही तोपर्यंत व्दिपक्षीय संबंध व्यवस्थित राहणार नाहीत.

भारताची स्पष्ट भूमिका आहे की, जोपर्यंत सीमेवर शांतता राहणार नाही, तोपर्यंत व्दिपक्षीय चर्चा शक्य नाही. मात्र, चीनचे म्हणणे आहे की, सीमेवरील तणाल मिटवत असताना व्दिपक्षीय चर्चा व्हायला पाहिजे. चीनने भारतात येऊनही चालबाजी केल्याचे दिसत आहे. आपलीच विधाने फिरवताना चीन दिसत आहे.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा