चीनचे ‘डॉल्फीन’ संकट भारतावर धडकले, मान्सूनवर गंभीर परीणाम, ३ लाख लोक…

चीनच्या डॉल्फिन चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरातील मान्सून सिस्टीमला धोका पोहचवला आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचे ढग कमजोर झाले आहेत.

चीनचे डॉल्फीन संकट भारतावर धडकले, मान्सूनवर गंभीर परीणाम, ३ लाख लोक...
monsoon
| Updated on: Aug 11, 2026 | 8:50 PM

ऑगस्ट २०२६ च्या प्रशांत महासागरात विकसित झालेले चक्रीवादळ डॉल्फिन चीनच्या पूर्व किनाऱ्यावर धडकल्याने मोठा उत्पात झाला आहे. यावर्षी चीनमध्ये पोहचलेले हे सर्वात शक्तीवाली चक्रीवादळ होते. यात १५१ किमी वेगाने वारे वाहल्याने मोठे नुकसान झाले होते. चीनमध्ये प्रचंड वेगाने पाऊस, पुर आणि तीन लाख लोकांना विस्थापित झाल्याच्या बातम्यांनी धडकी भरवली आहे. मात्र, याचा परिणाम केवळ चीनपर्यंत मर्यादित नव्हता तर भारताच्या मान्सूनच्या ढगांना देखील याचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे.

ऑगस्टमध्ये प्रशांत महासागरात विकसित झालेल्या टायफून डॉल्फीनने चीनच्या पूर्व किनाऱ्यावर मोठा फटका बसला आहे. यावर्षी चीनमध्ये पोहचलेल्या या चक्रीवादळाने ४००० किलोमीटर दूर भारतातील मान्सूनवर याचा परिणाम झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्यामते हे टायफून डॉल्फीन वादळ वातावरणातील आद्रेतेला आपल्याकडे खेचत आहे.ज्यामुळे बंगालच्या खाडीत मान्सून सिस्टीम बनण्याची प्रक्रिया कमजोर पडली आहे.

प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या उष्णकटीबंधीय चक्रीवादळाला टायफून म्हटले जाते. अशी मोठी चक्रीवादळे वातावरणातील उष्णता आणि आद्रता आपल्याकडे खेचतात. यांना वायूमंडळीय स्पंज सारखे पाहिले जाते. डॉल्फिन पश्चिम प्रशांतमध्ये सक्रीय आहे. तेथील आद्रतेला आपल्या केंद्राकडे ते खेचत आहे. त्यामुळे बंगालच्या खाडीत आद्रता कमी उपलब्ध होत आहे, ते लो प्रेशर सिस्टीम आणि डिप्रेशन बनण्यासाठी गरजेचे असते.

लो प्रेशर सिस्टीम भारताच्या मध्य, पूर्व आणि उत्तर भागात मान्सूनच्या पावासाचा मुख्य स्रोत असतात. हवामान संशोधकांनी इशारा दिला होता आणि तो योग्य सिद्ध झाला होता. टायफून डॉल्फीनने अनेक संभावित सिस्टीमला रोकले. आता देखील आद्रता शोषत आहे. बंगालच्या खाडीत त्यामुळे ढगांचा घेरा कमी झाला आहे. मान्सूसची सिस्टीम कमी बनते.

पूर्व आणि पूर्वोत्तर भारतासाठी आशा

संपूर्णपणे दुष्काळ पडण्याची शक्यता नसली. बंगालच्या खाडीत स्थानिक स्तरावर काही लो प्रेशर सिस्टीम आताही बनू शकतात. ही सिस्टीम मुख्य रुपाने पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस आणू शकतात. ऑगस्टच्या उर्वरित दिवसात या भागात मान्सून सक्रिय राहू शकतो.

पश्चिम आणि मध्य भारतात काही भागात पाऊस कमी होत आहे. परंतू पूर्वोत्तर राज्य आणि पूर्व किनाऱ्याच्या आसपासची स्थिती आणखी चांगली राहण्याची शक्यता आहे. हवामान विभाग या स्थानिक सिस्टीमवर नजर ठेवून आहे.

ही घटना दर्शवते की एका क्षेत्राचे चक्रीवादळ दूरच्या हवामानाला कसे प्रभावित करु शकते. प्रशांत महासागरातील सक्रियता कधी कधी बंगालच्या खाडीत सिस्टीम बनवण्यासाठी मदत देखील करु शकते. परंतू सध्या स्थितीत हे आद्रता खेचत आहे. अल – निनो सारख्या मोठ्या पॅटर्न देखील यात भूमिका निभावू शकते.

भारतीय मान्सून जटिल प्रक्रिया आहे. ज्यात समुद्राचे तापमान, हवेचा प्रवाह आणि दबावाचा पॅटर्न सामील असतात. डॉल्फीन केवळ एक कारण आहे. मान्सून संपूर्णपणे संपलेला नाही.केवळ अस्थायी रुपाने कमजोर पडला आहे. ऑगस्टच्या उर्वरित दिवसात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात पाऊस सुरु राहू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us