या देशात प्रत्येक लहान मुलं पाकिस्तानशी लढतंय युद्ध, दिल्लीत पोहचलेल्या नेत्या म्हणाल्या.. भारताने घ्यावा पुढाकार

चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला सीपीईसी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्याबाबतही कादरी यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे. हा कॉरिडॉर बलुचिस्तानातील नागरिकांसाठी मृत्यूचे फर्मान असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा काही इकॉनॉमिक प्रकल्प नसून सैन्याचा प्रकल्प असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या देशात प्रत्येक लहान मुलं पाकिस्तानशी लढतंय युद्ध, दिल्लीत पोहचलेल्या नेत्या म्हणाल्या.. भारताने घ्यावा पुढाकार
भारतासमोर मदतीचे आवाहनImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 2:56 PM

नवी दिल्ली – बलुचिस्तानमधीन (Baluchistan)लहान मुलं आणि मुलीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत आहेत. पाकिस्तान (Pakistan)-बलुचिस्तानात सुरु असलेल्या गृह कलहात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांसाठी लढाई सुरु आहे. याच सगळ्यात दिल्लीत पोहचलेल्या बलुची कार्यकर्त्या आणि प्राध्यापक नायला कादरी बलोच यांनी या लढ्यात भारताने (India)मदत करावी असे आवाहान केले आहे. दहशतवादाचं केंद्र असलेल्या पाकिस्तानला संपवण्यासाठी, बलुचिस्तानशी भारत सरकारने हातमिळवणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. बलोच सध्या भारत भेटीवर आलेल्या आहेत. पाकव्याप्त काश्मिरातील त्यांनी सांगितलेली परिस्थिती ही अंगावर काटे आणणारी आहे.

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानची जबरदस्ती

पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तान सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या अत्याचारांचा पाढाच नायला कादरी यांनी यावेळी वाचला. पाकिस्तानने बलुचिस्तानवर अनधिकृतरित्या कब्जा केला असल्याचा बलुचिस्तानातील नागरिकांचा दावा आहे. बलुचिस्तान स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी २१ मार्च रोजी विस्थापितांच्या सरकारचे गठण केले आहे. कॅनडात विस्थापित झालेल्या वरिष्ठ बलुची नेत्या प्राध्यापक नायला कादरी यांना या सरकारचे प्रमुखपद देण्यात आले आहे. सध्या जागतिक पातळीवर या प्रश्नी लक्ष वेधण्याचे काम नायला कादरी करत असून, त्याचाच एक भाग म्हणून त्या सध्या भारत भेटीवर आलेल्या आहेत. पाकिस्तान आणि चीन यांचा एकत्रितरित्या बलुचिस्तानातील बलूच वंश संपवण्याचा कट असल्याचा आरोप विश्व बलूच महिला संघाच्या अध्यक्ष नायला कादरी यांनी केला आहे. पाकिस्तानकडून बलूचींचा नरसंहार सुरु असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

सीपीईसीचे सत्य आणले समोर

चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला सीपीईसी म्हणूनही ओळखले जाते. त्याच्याबाबतही कादरी यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे. हा कॉरिडॉर बलुचिस्तानातील नागरिकांसाठी मृत्यूचे फर्मान असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा काही इकॉनॉमिक प्रकल्प नसून सैन्याचा प्रकल्प असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बलुचिस्तानातील बंदरांना विकण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या पूर्वजांच्या जमिनींवर चिनी आणि पाकिस्तानींच्या वस्त्या निर्माण करण्यात येत असून, आपल्याला तिथून विस्थापित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

नरेंद्र मोदींच्या कौतुकाने आल्या होत्या चर्चेत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बलुचिस्तानासाठी एका हिरोसारखे आहेत, असे वक्तव्य २०१६ साली नायला कादरी यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली होती. भारत सरकारने परवानगी दिली तर बलुचिस्तानातील विस्थापितांचे सरकार वाराणसीत गठित केले जाईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केले होते. बलुचिस्तान जर उद्या स्वतंत्र झाला तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावू असेही त्या म्हणाल्या होत्या.

बलुचिस्तानात सुरु आहे संघर्ष

स्वातंत्र्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून बलुची नागरिक संघर्ष करीत आहेत. महिनाभरापूर्वी बिलोच लिबरेशन आर्मीच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्य यंत्रणांविरोधातील हल्ले वाढवले होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आयएसआयच्या करन शहरातील कार्यालावर रॉकेट डागण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. याला कुणी अधिकृत पुष्टी दिली नसली तरी त्या परिसरात पोलिसांच्या गाड्या आणि एम्ब्युलन्स पाहायला मिळाल्या होत्या.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.