AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Ajay | Israel-Hamas war पार्श्वभूमीवर आजपासून भारताच ऑपरेशन ‘अजय’

Operation Ajay | काय आहे हे ऑपरेशन 'अजय'. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा वापर होणार. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता वाढत चालली आहे.

Operation Ajay | Israel-Hamas war पार्श्वभूमीवर आजपासून भारताच ऑपरेशन 'अजय'
Operation Ajay Israel-Hamas warImage Credit source: AFP
| Updated on: Oct 12, 2023 | 7:55 AM
Share

जेरुसलेम | इस्रायल-हमास युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे. इस्रायलने हमासकडून आपला भूभाग परत मिळवला आहे. हमासचे दहशतवादी ज्या मार्गाने घुसले, त्या दक्षिण इस्रायलच्या सीमेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. इस्रायली सैन्य आता गाझा पट्टीत घुसण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी इस्रायली रणगाडे सीमेवर तैनात झाले आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने हवाई हल्ले सुरु आहे. इस्रायलच्या आकाशात फायटर जेट्सचा आवाज ऐकायला मिळतोय. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस या युद्धाची भीषणता वाढत चालली आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूला हजारो मृत्यू झाले आहेत. शत्रू पूर्णपणे हतबल होईल इतकी इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. पण हमासचे दहशतवादी सुद्धा काही ठिकाणी प्रत्युत्तर देतायत. संपूर्ण इस्रायलमध्ये युद्धाचे सायरन सतत वाजत आहेत. हा सायरन वाजल्यानंतर नागरिक लगेच शेल्टर गाठण्यासाठी धावा घेतायत.

इस्रायलमध्ये पुढचे काही दिवस असच चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांसाठी येणारे दिवस सोपे नसतील. युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध देश आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करतायत. इस्रायल-हमास युद्धात वॉर झोनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने बुधवारी ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी आजपासून ‘ऑपरेशन अजय’ सुरु होणार आहे. भारत सरकारने आपल्या नागरिकांना इस्रायलमधून मायदेशी आणण्यासाठी विशेष चार्टड विमानांची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा सुद्धा वापर केला जाईल.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?

“ज्यांना मायदेशी परतायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आम्ही ऑपरेशन अजय सुरु करत आहोत. विशेष चार्टड विमान आणि अन्य व्यवस्था करण्यात येईल” अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक्सवरुन दिली. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. स्पेशल फ्लाइटसाठी नोंदणी करणाऱ्या भारतीय नागरिकांची यादी ई-मेल केली आहे असं तेल अवीवमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.