AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri lanka Crisis : गोटबाया राजपक्षे श्रीलंका सोडून पळाले; श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण? ‘या’ तीन नावांची चर्चा

श्रीलंकेत आर्थिक संकटासोबतच राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळाले आहेत. त्यामुळे आता येत्या 20 तारखेला श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

Sri lanka Crisis : गोटबाया राजपक्षे श्रीलंका सोडून पळाले; श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण? 'या' तीन नावांची चर्चा
| Updated on: Jul 13, 2022 | 10:51 AM
Share

कोलंबो : श्रीलंका (Sri lanka Crisis) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र आता श्रीलंकेत आर्थिक संकटासोबतच राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळाले आहेत. ते श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राजीनामा देणार होते. मात्र त्यापूर्वीच ते देश सोडून पळाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षारक्षक देखील आहेत. गोटबाया राजपक्षे हे मालदीवला (Maldives) गेले आहेत. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मालदीवचे लोकसभा अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी राजपक्षे यांचे मालदीवमध्ये स्वागत केले. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी देश सोडला या वृत्ताची श्रीलंकेच्या कुठल्याही अधिकृत संस्थेकडून किंवा वर्तमानपत्रातून माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर आता श्रीलंकेतील सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत. सर्व पक्षीय सरकार बनवून श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आता गोटबाया राजपक्षे यांच्यानंतर श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासाठी सध्या तीन नावे समोर आली आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी तीन नावे चर्चेत

स्थानिक वृत्तपत्र डेली मिररने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी तीन जणांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाचे खासदार डलेस अलप्परुमा आणि विरोधी पक्षनेता जाजिथ प्रेमदासा यांची नावे चर्चेत आहेत. श्रीलंकेत येत्या वीस तारखेला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या उमेदवाराला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल तो उमेदवार श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती असणार आहे. 1 मे 1993 नंतर प्रथमच श्रीलंकेत राष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे. राष्ट्रपती आर. प्रेमदासा यांची हत्या करण्यात आल्याने 1993 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मध्यवधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर आता राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

श्रीलंकेत कडेकोट बंदोबस्त

श्रीलंका गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अखेर शनिवारी नागरिकांच्या संयमाचा बांद फुटला आणि त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान देखील जाळले. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीलंकेला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जागोजागी सैन्य तैनात करण्यात आले आहे. अनेकदा आंदोलक आणि सैनिकांमध्ये चकमकी उडत असल्याचे पहायला मिळत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.