AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-maldive Row : भारत-मालदीव संबंध बिघडल्याने चीनकडून आगीत तेल टाकण्याचं काम

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. पण याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून होत आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने आगीत तेल टाकण्याचे काम सुरु केले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका देखील केली आहे.

India-maldive Row : भारत-मालदीव संबंध बिघडल्याने चीनकडून आगीत तेल टाकण्याचं काम
| Updated on: Feb 07, 2024 | 5:14 PM
Share

India maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही शेजारील देशामध्ये तणाव कायम आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार आल्याने संबंध संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. चीन याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तो मालदीवशी जवळीक वाढवत आहे.

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आता विष पसरवरणारी बातमी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भारत-मालदीवमधील संघर्ष प्रथम शेजारच्या बांधिलकीची चाचणी घेतो’. या लेखात हत्तीचा चेहरा असलेला माणूस दाखवला आहे. ज्याच्या हातात काटेरी छडी दिसतेय.

भारतावर टीका

मालदीवशी भारताचे संबंध किती अस्वस्थ आहे हे या लेखात लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सच्या मते, दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये भारताविरोधात नकारात्मकता वाढत आहे. मोदी सरकारने आता आपल्या पारंपरिक बिग ब्रदरचा विचार सोडून योग्य तोडगा काढावा.

लेखात असे लिहिले आहे की, आपली भक्कम स्थिती आणि नेबर फर्स्ट धोरण अवलंबत असले तरी देखील शेजारील देशांची मने जिंकण्यात अपयशी ठरत आहे. दोन शेजारी देशांमधील वादाचे कारण म्हणजे मालदीवमध्ये तैनात असलेले भारतीय सैनिक.

लेखात पुढे म्हटले आहे की मालदीवच्या नवीन सरकारने भारतीय सैनिकांना 10 मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत, परंतु भारत सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. अशा स्थितीत हे मुत्सद्दी नाटक पुढे जाणे अपेक्षित आहे.

भारतावर आरोप

ग्लोबल टाइम्सने भारताकडून मालदीववर सतत दबाव आणल्याचा आरोप केला आहे. भारतीय तटरक्षक दल मालदीवच्या बोटींना रोखत आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात काहीही होऊ शकते. मोदी सरकारने मालदीवच्या विकास मदतीतही कपात केली आहे, यावरून सध्याच्या सरकारच्या विरोधातील उदासीनता दिसून येते.

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याने चीन देखील त्यात आणखी मीठ टाकण्याचं काम करत आहेत. चीनकडून पाठिंबा मिळत असल्याने मालदीवरचे राष्ट्राध्यक्ष देखील भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.