AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-युक्रेन युद्ध रोखू शकतो भारत? पाहा ऑस्ट्रियाचे चान्सलर काय म्हणाले

युक्रेन आणि रशिया या दोन देशातील संघर्ष अजूनही कायम आहे. दोन्ही देशांमध्ये शांतीने चर्चा करुन मार्ग काढावा अशी भूमिका भारताने याआधीही घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षानंतर रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं आवाहन केलं.

रशिया-युक्रेन युद्ध रोखू शकतो भारत? पाहा ऑस्ट्रियाचे चान्सलर काय म्हणाले
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 10, 2024 | 8:31 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भारत हा एक प्रभावशाली आणि विश्वासार्ह देश आहे. रशिया-युक्रेन शांतता प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी तटस्थ राहून चर्चा करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औपचारिक चर्चेनंतर त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेहमर यांनी ही प्रतिक्रिया दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे नेहमर यांनी म्हटले आहे. मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर मोदी ऑस्ट्रियामध्ये पोहोचले आहेत.

रशिया-युक्रेन संदर्भात सविस्तर चर्चा

“आम्ही युक्रेन विरुद्ध रशिया युद्धावर तपशीलवार संभाषण केले,” चान्सलर नेहॅमर म्हणाले की. ऑस्ट्रियाचा फेडरल चांसलर म्हणून, भारताचे आकलन जाणून घेणे आणि भारताची युरोपीय समस्यांशी ओळख करून देणे हे माझ्यासाठी विशेष महत्वाचे आहे. याशिवाय पश्चिम आशियातील संघर्ष हा प्रमुख विषय होता, असे नेहमर म्हणाले. मोदींनी ऑस्ट्रिया दौऱ्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. “त्यामुळे शांतता चर्चेबाबत रशियाच्या हेतूंचे पंतप्रधानांचे वैयक्तिक मूल्यांकन ऐकणे विशेषतः महत्वाचे होते.” असे ही ते म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाला जाण्यापूर्वी 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवस रशियात होते. पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की युक्रेन संघर्षाचे निराकरण युद्धभूमीवर शक्य नाही आणि बॉम्ब आणि गोळ्यांमध्ये शांततेचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्राप्त करणे हे आमचे समान उद्दिष्ट आहे.”

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धाते हजारो लोकांचा जीव गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेसाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन दोन्ही देशांना केले होते. आजही ते याच भूमिकेवर ठाम आहेत.

‘युद्ध असो, संघर्ष असो की दहशतवादी हल्ले, माणसांचे प्राण गेले तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुःख होते. निष्पाप मुले मारली जात असली तरी जेव्हा आपण निष्पाप मुले मरताना पाहतो तेव्हा ते हृदय पिळवटून टाकणारे आणि वेदनादायक असते. रशियाच्या भूमीवरुन पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?