AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी नागरिकांना नो एन्ट्री असताना अफगाणिस्तानला एन्ट्री, व्हिसासंदर्भात भारताचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेधही केला होता. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचे पाकिस्तानसोबत संबंध चांगले नाहीत. भारत सरकारसोबत दोन प्रकल्पावर अफगाणिस्तान काम करत आहे.

पाकिस्तानी नागरिकांना नो एन्ट्री असताना अफगाणिस्तानला एन्ट्री, व्हिसासंदर्भात भारताचा मोठा निर्णय
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
| Updated on: May 27, 2025 | 9:58 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान नागरिकांना भारतात नो एन्ट्री केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी भारताचे दरवाजे उघडे केले आहे. अफगाणिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा सुरु केली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात उपचार करायचे आहेत, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, व्यापारी, यूएन डिप्लोमॅट यांनाही व्हिसा दिला जाणार आहे. पाच वर्ष भारत आणि अफगाणिस्तानमधील व्हिसा सेवा बंद होती.

अफगाणिस्तानमधील नागरिकांना व्हिसाचा अर्ज देताना एक फोटो, पासपोर्टची माहिती, एक इतर ओळखपत्र पोर्टलवर सबमिट करावा लागणार आहे. भारताने घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध सामान्य होत आहे. अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेधही केला होता. तसेच तालिबान सरकारने भारताला सांगितले की, अफगाणिस्तानच्या जमिनीवरुन दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही.

अफगाणिस्तानसोबत भारताचे संबंध सुधारत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात असणारे दहशतवादी, डूरंड लाइनचा वाद यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध स्थगित केले. सिंधू जलकरार स्थगित करत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला. तसेच सीमा बंद करत दोन्ही देशांमधील व्यापारही थांबवला.

मागील महिन्यात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर अफगाणिस्तान तालिबान सरकारमधील समकक्ष मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यासोबत चर्चा केली होती. तालिबान सरकार आल्यानंतर ही पहिलीच चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली. तसेच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान चाबहार पोर्टसंदर्भातही करार झाला आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरसाठीही दोन्ही देश काम करत आहे. हा कॉरिडोर भारतातून इराण, रशियामार्ग यूरोपला जोडणारा आहे. या दोन्ही महत्वाच्या प्रकल्पांवर भारत-अफगाणिस्तानसोबत आहे तर दोन्ही देशांचे पाकिस्तानसोबत संबंध चांगले नाहीत.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....