AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी नागरिकांना नो एन्ट्री असताना अफगाणिस्तानला एन्ट्री, व्हिसासंदर्भात भारताचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेधही केला होता. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचे पाकिस्तानसोबत संबंध चांगले नाहीत. भारत सरकारसोबत दोन प्रकल्पावर अफगाणिस्तान काम करत आहे.

पाकिस्तानी नागरिकांना नो एन्ट्री असताना अफगाणिस्तानला एन्ट्री, व्हिसासंदर्भात भारताचा मोठा निर्णय
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
| Updated on: May 27, 2025 | 9:58 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान नागरिकांना भारतात नो एन्ट्री केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी भारताचे दरवाजे उघडे केले आहे. अफगाणिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा सुरु केली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात उपचार करायचे आहेत, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, व्यापारी, यूएन डिप्लोमॅट यांनाही व्हिसा दिला जाणार आहे. पाच वर्ष भारत आणि अफगाणिस्तानमधील व्हिसा सेवा बंद होती.

अफगाणिस्तानमधील नागरिकांना व्हिसाचा अर्ज देताना एक फोटो, पासपोर्टची माहिती, एक इतर ओळखपत्र पोर्टलवर सबमिट करावा लागणार आहे. भारताने घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध सामान्य होत आहे. अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेधही केला होता. तसेच तालिबान सरकारने भारताला सांगितले की, अफगाणिस्तानच्या जमिनीवरुन दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही.

अफगाणिस्तानसोबत भारताचे संबंध सुधारत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात असणारे दहशतवादी, डूरंड लाइनचा वाद यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध स्थगित केले. सिंधू जलकरार स्थगित करत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला. तसेच सीमा बंद करत दोन्ही देशांमधील व्यापारही थांबवला.

मागील महिन्यात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर अफगाणिस्तान तालिबान सरकारमधील समकक्ष मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यासोबत चर्चा केली होती. तालिबान सरकार आल्यानंतर ही पहिलीच चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली. तसेच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान चाबहार पोर्टसंदर्भातही करार झाला आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरसाठीही दोन्ही देश काम करत आहे. हा कॉरिडोर भारतातून इराण, रशियामार्ग यूरोपला जोडणारा आहे. या दोन्ही महत्वाच्या प्रकल्पांवर भारत-अफगाणिस्तानसोबत आहे तर दोन्ही देशांचे पाकिस्तानसोबत संबंध चांगले नाहीत.

Follow Us
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....