अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान इराणकडून भारताबद्दल थेट मोठे विधान, म्हटले, भारत…

इराणकडून नव्या सर्वाेच्च नेत्याची घोषणा करण्यात आला. ज्यानंतर इस्त्रायलकडून थेट धमकी देण्यात आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराण चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, मोठे हल्ले केले जात असून चर्चेची वेळ निघून गेल्याचेही अमेरिकेने म्हटले.

अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान इराणकडून भारताबद्दल थेट मोठे विधान, म्हटले, भारत...
Iran
| Updated on: Mar 04, 2026 | 1:52 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. इस्त्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ला करत आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणला धमकी दिली जात आहे. इराण आणि इस्त्रायलचे लोक बंकरमध्ये लपून बसले आहेत. मोठे हल्ले सतत सुरू आहेत. इराण युद्धात एक पाऊस पुढे दिसत आहे. इराणने त्यांच्या शस्त्रसाठाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. जगातील कोणत्याही देशाने विचार केला नसेल इतका मोठा शस्त्रसाठा इराणकडे आहे. इराणने जगातील सर्व देशांपासून लपवून इतका मोठा शस्त्रसाठा जमवला. हेच नाही तर इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेने अणू चाचणी केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या काही भागात भूकंपाचे झटके बसल्याचे सांगण्यात आले. आता अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात इराणी अधिकारी थेट पुढे आले असून त्यांनी अत्यंत मोठा खुलासा केला.

इराणी अधिकाऱ्यांनी थेट भारताच्या नावाचा देखील उल्लेख केला. इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर जागतिक संघर्षांना खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे. आपली ताकद ठेवण्याकरिता अमेरिकेकडून असे केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. इराणचे भारतातील विशेष प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी एएनआयसोबत बोलताना अनेक विषयांवर थेट भाष्य केले.

त्यांनी म्हटले की, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाचा अमेरिकेचा एकच मुख्य उद्देश आहे की, भारत चीनसारख्या उदयोन्मुख शक्तींच्या प्रगती थांबवणे आहे. भविष्यात, भारत, रशिया, अमेरिका आणि चीन जगातील सर्वात जास्त शक्तीशाली देश असतील. मुळात म्हणजे अमेरिकेला दुसऱ्या कोणत्याही देशाला शक्तीशाली बनू द्यायची नाहीये.

त्यांचे स्पष्टपणे धोरण आहे की, आपला जागतिक प्रभाव टिकवून ठेवणायचा असेल तर युद्धांना प्रोत्साहन द्यायचे. भारताबद्दल अत्यंत मोठे विधान करण्यात आले. भारताने इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासांमध्ये 8 देशांसोबत चर्चा केली. भारताने या युद्धात अध्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.

Follow Us