भारताने जगाला दाखवली थेट शक्ती, भारताचा अत्यंत मोठा करार, चीनचा थरकाप..

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे. त्यामध्येच भारताने मोठी बाजी मारली. अमेरिका आणि इराण ज्या गोष्टीसाठी भांडण करत बसली आहेत. त्याबाबतच भारत अत्यंत मोठा करार करतोय. हा भारताचा विजय म्हणावा लागेल.

भारताने जगाला दाखवली थेट शक्ती, भारताचा अत्यंत मोठा करार, चीनचा थरकाप..
India and Australia Agreement
| Updated on: Jul 09, 2026 | 12:21 PM

युरेनियमसाठीच इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटले आहे. दशकांपासून ते या मुद्द्यावर लढत आहेत. कित्येक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी युद्ध थांबले होते पण आता युद्ध पुन्हा भडकताना दिसत आहे. त्यामध्येच ज्या युरेनियमच्या मुद्द्यात युद्ध पेटलेले असतानाच भारत त्याच युरेनियमबद्दल मोठा करार करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्यात मोठा करार होण्याची शक्यता आहे. याच सर्वात महत्वाचे आहे ती म्हणजे युरेनियम डील. या करारामार्फत भारत हा ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम आयात करेल. या करारावर चीनची बारीक नजर असणार आहे. नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारताच्या हिंद प्रशांत रणतीनीचा महत्वाचा टप्पा सुरू झाला.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, चीनच्या वाढलेल्या हालचाली, समुद्र सुरक्षा अधिक मजबूत बनवणे हे मुद्दे महत्वाची आहेत. अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमची आयात हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाजवळ जगातील सर्वात मोठा युरेनियम साठा आहे. जगातील एकूण एक चाैथा हिस्सा युरेनियमचा ऑस्ट्रेलियाकडे आहे.

भारतात त्याबाबतच आता थेट करार ऑस्ट्रेलियासोबत करणार आहे. या कराराकडे जगाच्या नजरा आहेत. चीन सरकारची खनिज कंपन्यांची नामीबिया आणि नाइजरच्या प्रमुख युरेनियम खाडीमध्ये मोठा करार आहे. हेच नाही तर कजाखस्तानमधील सर्वात मोठा खरेदीदारही चीनच आहे. त्यामध्येच आता भारताने ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम आयात करण्याचा निर्णय घेतला.

भारतासमोर हा मोठा पर्याय आहे. ऑस्ट्रेलियाकडू भारताने युरेनियम आयात केले तर भारत देश युरेनियम परमाणु क्षमतांमध्ये अधिक मजबूत होईल. इराण आणि अमेरिका याकरिता भांडणे करत बसले आणि भारताने दुसरीकडे बाजी मारली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील करार जवळपास निश्चितच आहे. फक्त त्याची घोषणा होणे बाकी असल्याचे सांगितले जाते. हा मोठा विजय भारताचा म्हणावा लागेल. हा चीनकरिता मोठा धक्का आहे. भारत आपली ताकद वाढत आहे. भारताने मोठी बाजी मारली.

Follow Us