AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशनं सरड्यासारखा रंग बदलला, आधी भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नंतर स्पष्टीकरण देण्याची वेळ

बांगलादेशचे मुख्य मोहम्मद युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळला आहे. आता बांगलादेशने या प्रकरणी भारताचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. युनूसच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे बांगलादेशने म्हटले आहे.

बांगलादेशनं सरड्यासारखा रंग बदलला, आधी भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नंतर स्पष्टीकरण देण्याची वेळ
नरेंद्र मोदी आणि मुहम्मद युनूस
| Edited By: | Updated on: Apr 03, 2025 | 3:34 PM
Share

भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांबाबत मोहम्मद युनूस यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यावर बांगलादेशने आता स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यात युनूस यांनी सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील सात भारतीय राज्यांचे वर्णन एक वेढलेला प्रदेश म्हणून केले होते. युनूस यांच्या या वक्तव्यावर भारतातील अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे वक्तव्य प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश तोडण्याचीही चर्चा होती.

बांगलादेशचे मुख्य सल्लागार युनूस यांच्या ईशान्य भारताविषयीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांच्या एका प्रमुख सहकाऱ्याने म्हटले आहे. रोहिंग्या आणि इतर प्राधान्यक्रमांसाठी मोहम्मद युनूसचे उच्च प्रतिनिधी खलिलुर रहमान यांनी माध्यमांना सांगितले की, “त्यांनी (युनूस) प्रामाणिक विधान केले. जर लोकांनी याचा गैरसमज केला तर आम्ही ते थांबवू शकत नाही.’

युनूस काय म्हणालेत?

बीजिंग दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात मोहम्मद युनूस म्हणाले होते की, ‘ईशान्य भारतातील सात राज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात. हा भारताचा भूपरिवेष्ठित प्रदेश आहे. त्यांना समुद्रात जाण्यासाठी मार्ग नाही. या प्रदेशातील समुद्राचे आपण एकमेव संरक्षक आहोत. चीनसाठी ही मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. मोहम्मद युनूस यांचे हे विधान समोर आल्यानंतर भारतातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे लज्जास्पद आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.

भारताची तिखट प्रतिक्रिया

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मोहम्मद युनूस यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर चिकन नेक नावाच्या सिलिगुडी कॉरिडॉर आणि आजूबाजूच्या परिसरात मजबूत रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विकसित करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. युनूस यांच्या वक्तव्यातून मोठ्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित झाल्या असून त्याकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला. टिपरा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योत वर्मा यांनी तर बांगलादेश तोडून ईशान्येला समुद्रात प्रवेश देण्याची सूचना केली होती.

बँकॉकमध्ये मोदी आणि युनूस यांची भेट होऊ शकते

दरम्यान, बँकॉक येथे होणाऱ्या बिमस्टेक परिषदेदरम्यान मोहम्मद युनूस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात, असे बांगलादेशने म्हटले आहे. दोन्ही नेत्यांच्या संभाव्य भेटीबाबत खलिलुर रहमान म्हणाले की, ही भेट होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीसाठी बांगलादेशने संपर्क साधला आहे, असे ते म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.