AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी जलप्रलयात ६२६ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो बेपत्ता आहेत. या हाहाकारात रमाया तमांग या ६० वर्षीय महिलेने आपल्या आजारी पतीला सोडून जाण्यास नकार दिला आहे. 'एकत्र जगू, एकत्र मरू' या तिच्या भूमिकेतून पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि निस्सीम प्रेमाचे दर्शन घडते, जे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू...’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 1:13 PM
Share

नेपाळमध्ये विनाशकारी जलप्रलय आल्याने हाहाकार उडाला आहे. या जलप्रलयात 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. अनेकांची घरे वाहून गेली. शेती वाहून गेली अन् जनावरेही वाहून गेलीय. संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला आहे. क्षणार्धात सर्व होत्याचं नव्हतं झालं आहे. काही लोक तर आजही आपल्या घरातील व्यक्तींचा वणवण करत शोध घेत आहेत. काही लोक जगण्यासाठी इतरत्र गेले आहेत. तर काहीजण अजूनही आपल्या घरातील आजारी व्यक्तींना सोडून जायला तयार नाहीत. एका बुजुर्ग महिलेनेही आपल्या आजारी नवऱ्याला सोडून जाण्यास नकार दिलाय. आता एकत्रच जगू आणि एकत्रच मरू. पण मी नवऱ्याला सोडून जाणार नाही. जे होईल ते, असं ही बुजुर्ग महिला म्हणत आहे.

रमाया तमांग असं या बुजुर्ग महिलेचं नाव आहे. रमाया ही 60 वर्षाची आहे. ज्या त्रिशूली बाजारात सर्व काही नष्ट झालं, तिथल्या आपल्या घराच्या बाहेर रमाया एकटीच बसून एकटक पाहत असते. काही तरी मदत मिळेल, कोणी तरी विचारपूस करायला येईल ही तिला आशा आहे. जेव्हा मीडियाची नजर रमायावर पडली. तेव्हा त्यांनी तिच्याशी संवाद साधला. संवाद साधताना रमायाने जे काही सांगितलं त्याने सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. क्षणभर काळजात धस्स झालं.

बाजारात स्मशान शांतता

नेपाळच्या त्रिशूली बाजारातही पुराचं तांडव माजलं होतं. या बाजाराचा मोठा भाग नेस्तनाबूत झाल आहे. आता चीनने तिबेटमध्ये दुसरं सरोवर फुटण्याचा इशारा दिला आहे. नेपाळ प्रशासनाने त्रिशूली बाजार खाली केला आहे. लोकांना निघून जायला सांगितलं आहे. त्यामुळे हा बाजार खाली झाला आहे. संपूर्ण बाजारात शुकशुकाट पसरला आहे. स्मशान शांतता परसली आहे. पण रमाया मात्र त्रिशूली बाजार सोडून गेलेली नाहीये. ती आपल्याच घरात आहे.

नवऱ्याला कसं टाकून जाऊ?

सर्व लोक आपला बोऱ्या बिस्तरा घेऊन सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. तू का जात नाही? असा सवाल रमायाला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली, कुठे जाऊ? घरात नवरा आजारी आहे. तो चालू शकत नाही. त्याला सोडून, टाकून कसं जाऊ? आम्ही एकत्र एवढी वर्ष काढली. एकमेकांच्या सुखदु:खाचे साक्षीदार झालो. सोबतच जगलो. आता सोबतच मरू. यावेळी तिने तिच्या कुलदैवतेला प्रार्थना केली. आता देवाला जे करायचं तेच होईल. पण नवऱ्याला अशा अवस्थेत टाकून जाता येणार नाही, असं रमाया म्हणाली.

रमायाची कहाणी नवरा बायकोच्या अतूट नाश्त्याचे बंध उलगडवून दाखवते. आजच्या काळात थोड्यास्या कारणाने लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, अशावेळी संकटाच्या काळात सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी असूनही केवळ नवरा आजारी आहे. तो चालू शकत नाही म्हणून रमाया त्याच्यासोबत जीव धोक्यात घालून गावात राहिली आहे. यातून आजच्या पिढीला बरंच शिकण्यासारखं आहे.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी