नेपाळवर पुन्हा महाभयंकर संकट! कधीही फुटू शकतं सरोवर; चीनचा थेट इशारा
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरानंतर लेंडे नदीवरील नव्याने तयार झालेले हिमनदी सरोवर कधीही फुटू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. सरोवरातील पाण्याचा रंग गडद होत असून, ते वेगाने वाढत आहे. या स्फोटामुळे प्रति सेकंद 500 घनमीटर पाणी वाहून मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळमध्ये चार दिवसांपूर्वी आलेल्या महापुरानंतर देशावरचं संकट अजून काही टळलेलं नाही. नेपाळवर अजून एक संकट घोंघावत आहे. लेंडे नदीच्या वरच्या भागातील सरोवर कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे, असा इशाराच चीनने नेपाळला दिला आहे. या सरोवरातील पाणी सातत्याने गडद होत आहे. हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. सरोवर फुटल्यानंतर नदी में पाण्याचे लोट 500 घन मीटर प्रति सेकंद वाहू शकते, असा इशाराही चीनने दिला आहे. त्यामुळे नेपाळचं टेन्शन वाढलं आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार, चीनने ही माहिती सर्वात आधी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाशी शेअर केली आहे. पाण्याचा रंग सातत्याने गडद होत आहे. हा धोक्याचा इशारा आहे. याचा अर्थ सरोवर कधीही फुटण्याचे संकेत मिळत आहे, असं चीनने नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
या आठवड्यात नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडनंतर हे सरोवर तयार झालं आहे. ग्लेशियर तुटल्याने मोठा ढिगारा खाली आला. या प्रचंड ढिगाळ्यामुळे नदीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे एक नैसर्गिक बांध तयार झाला. त्याच्या मागे पाणी जमा होऊ लागल्याने मोठं सरोवर तयार झालं.
दोन नद्यांच्या संगमावर…
हे सरोवर चीनच्या जवळ चोचेन नदी आणि नेपाळच्या दिनेशने पुरेपू नदीच्या संगमावर बनलं आहे. चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरोवरात पाण्याचा स्तर सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी यात आतापर्यंत सुमारे 25 लाख घन मीटर पाणी जमा झालं आहे. धोका पाहता चीनने खालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच ड्रोन आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.
सरोवर फुटल्यास…
एका रिपोर्ट नुसार, सरोवर फुटल्यानंतर किती परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी चीनने एक मॉडल तयार केलं आहे. आकलनानुसार, अशा परिस्थितीत नदीच्या पात्रातून पाण्याचा कमाल प्रवाह प्रति सेकंद 500 घनमीटरपर्यंत पोहोचू शकतो. जर नैसर्गिक बांधचा काही भाग जरी फुटला तरी पाणी नदीच्या किनाऱ्याच्या आतच राहील. म्हणजेच अचानक पाणी वाढू शकतं. पण नदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू शकत नाही, असंही चीनचं एक आकलन आहे.
चीनच्या मते, शुक्रवारी सरोवराचं पाणी लेंडे खोला आणि त्रिशूली नदीमधून वाहण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत निर्माण झालेला धोका हाताळण्यासारखा होता असं मानलं गेलं. तरीही नेपाळची चिंचा वाढलेली आहे. बुधवारी झालेल्या महापुरात आतापर्यंत 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिबेटमध्ये सात लोक दगावल्याची पुष्टी झाली आहे.
