जगातील सर्वात महागडं विष; विंचूसमोर किंग कोब्राही फिका….एका लिटरची किंमत तब्बल…
जगातील सर्वात महागडं विष हे विंचवाचं असते. विंचूसमोर किंग कोब्राही फिका ठरतो. विंचूच्या एका लिटर विषाची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते.

जगात काही गोष्टी या सोने आणि हिऱ्यापेक्षाही अधिक महागड्या आहेत. चक्क विंचूच्या विषाची किंमत तब्बल कोट्यवधींच्या घरात आहे. विंचूचं विष हे किंग कोब्र्याहूनही अधिक खतरनाक आहे. विंचूच्या एका लिटर विषाची किंमत १ कोटी रुपये इतकी आहे. विंचूचं विषाची उपलब्धता फार कमी आहे, त्यामुळे विंचूच्या विषाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.
विंचूच्या विषात सर्वात खतरनाक केमिकल असते. एका विंचवांमधून फक्त 0.006 मीलीलिटर विष काढता येते. त्यामुळे एक गॅलन विष गोळा करण्यासाठी लाखो विंचूची गरज भासते. त्याचबरोबर विंचवांमधून विष बाहेर काढण्याची प्रक्रिया देखील कठीण आहे.
विष कसं काढले जाते?
विंचवाचे विष काढण्यासाठी हाताने पिळले जाते. विष काढण्यासाठी हलक्या स्वरुपात इलेक्ट्रिकल स्टिमुलेशनच्या डंखातून विष बाहेर सोडण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. ही प्रक्रिया सावधपणे केली जाते. विंचवातून विष बाहेर काढलं जातं, त्यावेळी सावधपणे जमा केले जाते. कारण या विषातील घटक वेगळ्या वेगळ्या प्रोटीन आणि पेप्टाइड संसोधनासाठी महत्वपूर्ण मानले जाते. शास्त्रज्ञांना विंचवाच्या विषाच्या विषारीपणापेक्षा त्याच्या वैद्यकीय उपयोगांमध्ये अधिक रस वाटतो. या विषातील घटकांवर संधोन केले जाते. जे मेंदूतील ट्यूमरीची पेशी ओळखण्यासाठी वापरतात. तसेच शस्त्रेक्रिये दरम्यान त्यांना चमकण्यास मदत करते.
कोणत्या प्राण्याचे विष खतरनाक?
सापाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन किंवा हेमोटॉक्सिन हे घटक आढळून येता. या घटकाचा शरीरातील नसा आणि रक्तावर परिणाम होतो. विषातील घटक रक्त मिसळण्यानंतर वेळेत उपचार मिळाले नाही तर मृत्यू होऊ शकतो. सापासारखे विंचूमध्येही न्यूरोटॉक्सिन घटक आढळतात. विंचूचे विष हे थेट शरीरातील अवयवांना निकाम करते. परंतु विंचू चावल्यानंतर कमी प्रमाणात विष सोडते. त्यामुळे विंचवाचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत दिसत नाही.
विंचू या प्राण्याच्या विषामध्येही न्यूरोटॉक्सिन आढळते. विंचूचे विष नसांवर परिणाम करून शरीराच्या अवयवांना निकामी करते. परंतु विंचू चावताना खूप कमी प्रमाणात विष सोडतो. त्यामुळे याचा फारसा परिणाम आरोग्यावर होत नाही. विंचूचे विष सापाच्या विषापेक्षा जास्त विषारी असते. परंतु विंचू चावल्यानंतर कमी प्रमाणात विष सोडते. त्यामुले व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होत नाही. पण साप व्यक्तीच्या शरीरात मोठ्या प्रमाणात विष सोडतो. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक बळावते.
