AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे.

पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार
नेपाळ नोट
| Updated on: Oct 31, 2024 | 1:18 PM
Share

Nepal Currency: पाकिस्तान आणि चीनकडून भारतासंदर्भात नेहमी कुरघोडी होत असते. हे देश भारताचा भूभाग आपला दाखवत असतात. त्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. परंतु आता आणखी एका देशाने भारताचा भूभाग आपला दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नेपाळने हा प्रयत्न केल्यानंतर नवीन वाद निर्माण होणार आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आल्यापासून हे सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. या सरकारने चीनची जवळीक निर्माण केली आहे.

भारताकडून तीव्र विरोध

नेपाळ सेंट्रल बँक, नेपाळ राष्ट्र बँकने (एनआरबी) चीनी कंपनीला नवीन 100 रुपयांच्या नोटा छापण्याचे काम दिले आहे. या नोटावर नवीन नकाशा दिला आहे. त्या नकाशामध्ये नेपाळमधील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आपला असल्याचा दावा नेपाळने केला आहे. नेपाळ कॅबिनेटने हा नवीन नकाशा मंजूर केला आहे. नेपाळने 18 जून 2020 रोजी राज्यघटनेत दुरुस्ती करून या भागांचा राजकीय नकाशामध्ये समावेश केला होता. त्यावेळी भारताने या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला होता. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.

नेपाळने त्यांच्या देशातील नोटा छापण्याचे कंत्राट चायना बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनला दिले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या करारानुसार चीनी फर्मला 100 रुपयांच्या नोटांच्या 300 दशलक्ष युनिट्सची छपाई करण्याचे काम सोपवले आहे. त्याचा अंदाजे उत्पादन खर्च अंदाजे 9 मिलियन दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे.

2020 पासून दोन्ही देशांत वाद

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे. यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. एकूण 1,850 किमी सीमारेषा दोन्ही देशांच्या लागून आहे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.