AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे.

पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार
नेपाळ नोट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 31, 2024 | 1:18 PM
Share

Nepal Currency: पाकिस्तान आणि चीनकडून भारतासंदर्भात नेहमी कुरघोडी होत असते. हे देश भारताचा भूभाग आपला दाखवत असतात. त्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. परंतु आता आणखी एका देशाने भारताचा भूभाग आपला दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नेपाळने हा प्रयत्न केल्यानंतर नवीन वाद निर्माण होणार आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आल्यापासून हे सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. या सरकारने चीनची जवळीक निर्माण केली आहे.

भारताकडून तीव्र विरोध

नेपाळ सेंट्रल बँक, नेपाळ राष्ट्र बँकने (एनआरबी) चीनी कंपनीला नवीन 100 रुपयांच्या नोटा छापण्याचे काम दिले आहे. या नोटावर नवीन नकाशा दिला आहे. त्या नकाशामध्ये नेपाळमधील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आपला असल्याचा दावा नेपाळने केला आहे. नेपाळ कॅबिनेटने हा नवीन नकाशा मंजूर केला आहे. नेपाळने 18 जून 2020 रोजी राज्यघटनेत दुरुस्ती करून या भागांचा राजकीय नकाशामध्ये समावेश केला होता. त्यावेळी भारताने या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला होता. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.

नेपाळने त्यांच्या देशातील नोटा छापण्याचे कंत्राट चायना बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनला दिले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या करारानुसार चीनी फर्मला 100 रुपयांच्या नोटांच्या 300 दशलक्ष युनिट्सची छपाई करण्याचे काम सोपवले आहे. त्याचा अंदाजे उत्पादन खर्च अंदाजे 9 मिलियन दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे.

2020 पासून दोन्ही देशांत वाद

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे. यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. एकूण 1,850 किमी सीमारेषा दोन्ही देशांच्या लागून आहे.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?