AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Plane Crash: आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात यश, खराब हवामान नाही तर ‘हे’ कारण ठरले अपघाताला कारणीभूत

पायलटने विमानाला शहरात अपघात होण्यापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जेणेकरून नुकसान कमी होईल. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराच्या दिशेने जात होते.

Nepal Plane Crash: आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात यश, खराब हवामान नाही तर 'हे' कारण ठरले अपघाताला कारणीभूत
नेपाळ विमान दुर्घटनाImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 5:12 PM
Share

पोखरा, रविवारी नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान कोसळले (Nepal Plane Crash). ताज्या माहितीनुसार, या अपघातानंतर आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोखरा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. पायलटने विमानाला शहरात अपघात होण्यापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जेणेकरून नुकसान कमी होईल. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराच्या दिशेने जात होते.  या विमानात 68 प्रवाशांसह एकूण 72 जण प्रवास करत होते. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या 10 सेकंद आधी हा अपघात झाला. विशेष म्हणजे नेपाळच्या या पोखरा विमानतळाचे उद्घाटन अवघ्या 14 दिवसांपूर्वीच झाले होते. हा अपघात दिवसा 11.10 वाजता झाला. हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या घाटात पडले.

हवामानामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात

विमान दुर्घटनेचे कारण खराब हवामान नसून तांत्रिक बिघाड असल्याचे नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. विमानाच्या पायलटने लँडिंगसाठी एटीसीकडून परवानगी घेतल्याचेही विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पोखरा एटीसीलाही लँडिंगसाठी ओके सांगण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.

पंतप्रधान प्रचंड यांनी बोलावली तातडीची बैठक

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली होती. पंतप्रधान प्रचंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत सरकारचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

पंतप्रधान प्रचंड यांनी दौरा रद्द केला

पोखरा विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि गृहमंत्री रबी लामिछाने आज पोखराला भेट देणार होते. पण काही वेळातच नेपाळ सचिवालयाकडून सांगण्यात आले की, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि गृहमंत्री रबी लामिछाने यांचा पोखरा दौरा रद्द करण्यात आला आहे.

चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे पोखरा विमानतळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्याच्या बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय आणखी एक माहिती अशी की, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

 पाच भारतीयांचाही समावेश

या विमानात 5 भारतीय नागरिकांसह 14 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 64 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.