पाकिस्तानची भारताने लावली पार वाट, भिकेला लागला पाक, थेट मोठा निर्णय, 100 टक्के..
भारताने पाकिस्तानची पार वाट लावली आहे. पहलगामवर हल्ला करून पाकिस्तानने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक केली. पाकिस्तानला भारताने आता पाण्यासाठीही मोतल केल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच भारताने मोठा डाव पुन्हा टाकला.

भारताने पार पाकिस्तानची वाट लावून टाकली आहे. पाकिस्तानला पळता भुई कमी केली. पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्तानने मोठी चूक केली. पाकिस्तानची आर्थिक स्थिती जगापासून लपून राहू शकली नाही. पाकिस्तानचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामध्येच आता भारताने पाण्यासाठीही पाकिस्तानला मोतल केले. पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार बंद केला. तो मोठा धक्का असतानाच एका मागून एक धक्के पाकिस्तानला दिली जात आहेत. रावी नदीच्या पाण्यावर आता 100 टक्के भारताचे नियंत्रण आहे. सिंधु जल करार भारताने स्थगित केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव आणण्याचे काम पाकिस्तानने केले. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाकिस्तानची पार इज्जत काढली. त्यातच सिंधु नदीच्या पाण्यासोबतच इतर नद्यांच्याही पाण्यावर भारत आपले नियंत्रण मिळवत आहे.
त्यामुळे पाकिस्तानवरील दबाव वाढत आहे. सिंधु नदीसोबतच रावी, सतलुज आणि ब्यास या नद्यांचे 20 टक्के पाणी पाकिस्तानला मिळत होते. आता भारताने सिंधु नदीचे पाणी रोखले आहे. यासोबतच धरणांची क्षमता वाढवली जात आहे. ज्या माध्यमातून जल वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जम्मू काश्मीर सरकारने सिंधु, झेलम आणि चिनाबवर काम सुरू केले आहे. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये येथून जाणारे 80 टक्के पाणी कमी झाले.
तशी येथे वीज निर्मिती जास्त केली जाणार नाही. पण पाणी रोखले जातंय. पंजाब आणि जम्मू काश्मीर च्या सीमेवर बनलेले शाहपुर कंडी बंधारा पूर्ण झाल्यानंतर रावी नदीच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण असेल. हेच नाही तर हे पाणी सांबा आणि कठुआकडे वळवण्यात येईल. भारत फक्त बोलत नाहीये तर डोक्याने पाकिस्तानचा गेम करत आहे.
भारताने घेतलेल्या या निर्णयाने पाकिस्तानची पार वाट लागली. भारतासोबत पंगा घेतल्याने पार पाण्यासाठी तडफण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. स्वत:च्या देशात पाणी पिण्यास नाही आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तान पुढे पुढे करत आहे. युएईकडून पाकिस्तानला देण्यात आलेले कर्ज परत मागण्यात आले. पाकिस्तान भीकेचा कटोरा घेऊन फिरत आहे.