AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला मोठा दणका! भारताविरोधात निर्णय घेणं चांगलंच भोवलं!

पहलगामवरील हल्ल्याला आता बरेच महिने झाले आहेत. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्ताननेही भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. या निर्णयांतर्गत पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे.

पाकिस्तानला मोठा दणका! भारताविरोधात निर्णय घेणं चांगलंच भोवलं!
pakistan and shehbaz sharif
| Updated on: Aug 10, 2025 | 3:17 PM
Share

Pakistan Vs India : पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तावर कठोर निर्बंध लागू केले. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास मज्जाव केला. पहलगामवरील हल्ल्याला आता बरेच महिने झाले आहेत. भारताच्या या कठोर निर्णयांनंतर पाकिस्ताननेही भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. या निर्णयांतर्गत पाकिस्तानने भारतासाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. कारण पाकिस्तानला या निर्णयामुळे तब्बल 127 कोटींचा तोटा झाला आहे.

127 कोटींवर सोडावे लागले पाणी

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करणे चांगलेच महागात पडले आहे. पाकिस्तानने भारताच्या विमामांना त्यांच्या हद्दीत प्रवेश न दिल्याने तब्बल 127 कोटींचे नुकसान झाले आहे. भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता.

रोज 100 पेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित

पाकिस्तानने भारतविरोधी घेतलेल्या या निर्णयांचा नेमका काय परिणाम झाला? याची माहिती पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत दिली. या माहितीनुसार पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केल्यामुळे रोज 100 पेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित झाले. त्याचाच परिणाम म्हणून 24 एप्रिल ते 30 जून या काळात 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (साधारण 127 कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे.

….तरी पाकिस्तान म्हणतो आमचा तोटा झालाच नाही

पाकिस्तानने याआधीही अनेकदा आपला एअरस्पेस बंद केलेला आहे. मात्र पाकिस्तानी एअरपोर्ट्स अथॉरिटीच्या सांगण्यांनुसार पाकिस्तानने भारातसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलेले असले तरी त्यांच्या एकूण नफ्यात वाढ झालेली आहे. 2019 साली पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाचे एकूण उत्पन्न 508000 डॉलर्स होते. आता ते वाढून साली 760000 डॉलर्स झाले आहे. 2019 साली पाकिस्तानी हद्दीतून जाणाऱ्या विमानांमुळे पाकिस्तानला रोज 4.24 कोटी रुपयांची कमाई व्हायची. आता 2025 साली या कमाईत 6.32 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे पाकिस्तानचे मत आहे. त्यामुळेच आम्ही भारतासाठी आमचे हवाई क्षेत्र बंद केलेले असले तरी आमच्या उत्पन्नात घट झालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे.

Follow Us
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.