AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकव्याप्त काश्मिरी जनतेच्या संतापाचा फुटला बांध; जनता रस्त्यावर, सरकारी यंत्रणा, पोलिसांना केली पळता भूई थोडी

Alarm to Pakistan : पाकव्याप्ती काश्मीरमधील परिस्थिती पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.

पाकव्याप्त काश्मिरी जनतेच्या संतापाचा फुटला बांध; जनता रस्त्यावर, सरकारी यंत्रणा, पोलिसांना केली पळता भूई थोडी
पीओकेमध्ये तांडव, जनता रस्त्यावर, पोलिसांना दिला चोप
| Updated on: May 12, 2024 | 3:40 PM
Share

भारतीय काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे झुकली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या इतक्या वर्षांच्या फसवणुकीविरोधात एल्गार पुकारला आहे. जनता रस्त्यावर आल्याने पाकिस्तान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. वीज संकट, महागाई आणि कराचा मोठा बोझ्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला. राजधानी मुझफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अनेक भागात त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना पिटाळून लावण्यात आले. त्यांना पळता भूई थोडी झाली आहे.

PoK मध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शन

राजधानी मुझफ्फराबादमध्ये आंदोलकांनी उग्र प्रदर्शन केले. इतकेच नाही तर पाकव्याप्त दादियाल, मीरपूर, समाहनी, सेहंसा, रावलकोट, खुइरट्टा, तत्तापानी आणि हट्टियन बाला या भागातही जोरदार प्रदर्शन झाले. या सर्व ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. जनतेच्या रेट्यापुढे पोलिसांना पळ काढावा लागल. तर काही ठिकाणी आंदोलकांना काठ्यांचा प्रसाद भेटला.

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग

पाकिस्तान गेल्या 70 वर्षांहून अधिक काळापासून या भागात दादागिरी करत आहे. तिथल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा परिणाम पीओकेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर संयुक्त जनता समितीने (JKJAAC) मुझफ्फराबादमध्ये बंदचे आयोजन केले होते. जनता रस्त्यावर येताच त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. उग्र प्रदर्शन सुरु झाल्यावर पोलिसांनी अश्रुधुराच गोळे सोडले आणि हवेत फायरिंग केले. पोलिसांनी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडले. मंगला धरणाची वीज मोफत मिळावी आणि पिठावरील कर माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

पोलिसांना लाठ्यांचा प्रसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक भागात जनता रस्त्यावर उतरली आहे. अटकाव करणाऱ्या पोलिसांवर जनतेचा राग निघाला. याविषयीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात लोक पोलिसांच्या काठ्या हिसकावून त्यांनाच फटकावत असल्याचे दिसत आहे. जनतेचे रौद्र रुप पाहून अनेकांनी काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा पण देण्यात आल्या. वाढीव कुमक आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.