AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आश्चार्य, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो, आम्हाला धडा मिळाला

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना साक्षात्कार झाला आहे. आता प्रथमच पाकिस्तानी पंतप्रधानांनी जाहीर कबुली दिली आहे. आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो आहे. आम्हाला धडा मिळाला आहे,

आश्चार्य, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो, आम्हाला धडा मिळाला
शहाबाज शरीफImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Jan 17, 2023 | 10:30 AM
Share

लाहोर : Pakistan PM Shehbaz Sharif: पाकिस्तान (pakistan)प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानमधील परकीय चलनाचा साठा संपत आला. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉलरवर आला आहे. पाकिस्तानच्या या परिस्थितीनंतर पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif)यांना साक्षात्कार झाला आहे. आता प्रथमच पाकिस्तानी पंतप्रधानांनी जाहीर कबुली दिली आहे. आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो आहे. आम्हाला धडा मिळाला आहे, असे एका मुलाखतीत शरीफ यांनी म्हटले. शहबाज यांनी अरबिया टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शांतीचा पाढा गायला. पाकिस्तानने शेजारी देशांशी मित्रात्वाने राहिले पाहिजे. एकदुसऱ्यांना मदत करुन विकास करायला हवा. एक-दुसऱ्यांशी भांडून आपला वेळा व संसाधन वाया घालवू नये. आमचे भारतासोबत तीन युद्ध झाले आहे. या तीन युद्धानंतर पाकिस्तानात गरीबी व बेरोजगारी आली. आम्हाला आमचा धडा मिळाला आहे. आता आम्हाला शांतता हवी आहे. आमचे प्रश्न सोडवायचे आहे.

मोदींना द्यायचा संदेश शाहबाज म्हणाले की, आम्हाला गरिबी संपवायची आहे. देशात समृद्धी आणायची आहे. आपल्या लोकांना चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. आम्हाला आमची संसाधने बॉम्ब आणि दारूगोळ्यावर वाया घालवायची नाहीत. हाच संदेश मला पंतप्रधान मोदींना द्यायचा आहे. आमच्याकडे अभियंते, डॉक्टर आणि कुशल मजूर आहेत. मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायचे आहे की, या सर्व गोष्टींचा उपयोग देशाच्या समृद्धीसाठी करायचा आहे, जेणेकरून या प्रदेशात शांतता प्रस्थापित होईल जेणेकरून दोन्ही देशांची प्रगती होईल.

सौदी अरेबियाबद्दल शाहबाज म्हणाले की, UAE आमचा मित्रराष्ट्र आहे आणि पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये शतकानुशतके मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तान अस्तित्वात येण्यापूर्वीपासून लाखो मुस्लिमांचे सौदी अरेबियाशी बंधुत्वाचे संबंध आहेत आणि ते मक्का आणि मदिना यात्रेला जात आहेत.भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी UAE महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.

काश्मीरवरुन पुन्हा बडबडले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज पुन्हा एकदा काश्मीरचा उल्लेख करत म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींना सांगायचे आहे की, आम्हाला शांततेत जगायचे आहे. पण काश्मीरमध्ये जे चालले आहे ते थांबवले पाहिजे. मानवी हक्कांचे उल्लंघन थांबले पाहिजे. वेळी माझा मोदींना संदेश आहे की आपण वाटाघाटीच्या टेबलावर बसून काश्मीरसारख्या ज्वलंत मुद्द्यावर गंभीर चर्चा केली पाहिजे. आपले दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहेत. यामुळे जर युद्ध झाले तर जे होईल ते सांगण्यासाठी कोणीही नसेल.

जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.