AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan power crisis : पाकिस्तानात वीज, इंधनाचा भीषण तुटवडा, रात्री दहानंतर लग्नसमारंभांवर बंदी

पाकिस्तानमध्ये इंधन आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना दिवसातून कित्येक तास भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.

Pakistan power crisis : पाकिस्तानात वीज, इंधनाचा भीषण तुटवडा, रात्री दहानंतर लग्नसमारंभांवर बंदी
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
| Updated on: Jun 10, 2022 | 1:32 PM
Share

आता श्रीलंकेनंतर पाकिस्तान (Pakistan) देखील मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. नव्या सरकारला देखील पाकिस्तानची आर्थिक घडी बसवण्यात अद्याप यश आलेलं नाही. पाकिस्तानमध्ये इंधन (Fuel Crisis) आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील नागरिकांना दिवसातून कित्येक तास भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. आद्याप पावसाळा सुरू झालेला नाही. उष्णतेमुळे विजेच्या (Electricity) मागणीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. मात्र विजेचा पुरवठा कमी पडत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. सरकारकडून विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विजेचा जास्त वापर होऊ नये यासाठी रात्री दहानंतर विवाह समारंभासारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महागाईच्या मुद्द्यावरच पाकिस्तानमधील इमरान खान सरकार कोसळले होते. मात्र त्यांच्या जागी सत्तेत आलेल्या नव्या सरकारला देखील महागाई, वीज आणि इंधन संकटावर अद्याप मार्ग काढता आलेला नाही.

आठ जूनपासून नवे आदेश लागू

सध्या पाकिस्तानमध्ये भीषण वीजटंचाई आहे. नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागत असल्यामुळे इस्लामाबादमध्ये रात्री दहानंतर लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. आठ जूनपासून हे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांना केवळ एकच डिश सर्व्ह करण्याची परवानगी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार लग्न समारंभावर ही बंधने आणली गेली आहेत.

कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

एवढंच नाही तर बाजारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री साडेआठनंतर बाजरपेठा सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. विजेची बचत करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. तसेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम शक्य आहे. त्यांनी वर्क फॉर्म होम करावे असे आदेश देखील सरकारने दिले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या एकूण 22,000 मेगा वॅट विजेचे उत्पादन होत आहे. मात्र पाकिस्तानला सध्या एकूण 26 हजार मेगा वॅट विजेची गरज आहे. दररोज गरजेपेक्षा विजेचे उत्पादन चार हजार मेगा व्हॅटने कमी होत आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?