AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या सहा महिन्यांत 86 टक्के भारतीय देणार नोकरीचा राजीनामा; काय आहेत जॉब सोडण्याची कारणे?

नोकरी सोडण्यात भारतीय जगात सर्वात पुढे असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात नोकरी सोडण्याचे प्रमाण आणखी वाढणार असल्याचा दावाही या अहवालामध्ये करण्यात आला आहे.

येत्या सहा महिन्यांत 86 टक्के भारतीय देणार नोकरीचा राजीनामा; काय आहेत जॉब सोडण्याची कारणे?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 11:14 AM
Share

भारतात पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (Employees) आपल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कोरोना काळानंतर कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने याबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पुढील सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण 86 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चांगला पगार (Salary) आणि वर्क लाईफचे (Work Life Balance) योग्य संतुलन या दोन प्रमुख कारणांमुळे राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकते असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार 61 टक्के असे कर्मचारी आहेत जे चांगल्या वर्क लाईफसाठी राजीनामा देऊ इच्छितात. कोरोना काळानंतर राजीनामा देणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढू शकते असे या अहवालात म्हटले आहे.

अहवाल काय सांगतो?

या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी आपल्या सध्या सुरू असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे संबंधित संस्थांचे काम प्रभावित होऊ शकते. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम देण्यात आले होते. मात्र यातील असे देखील काही कर्मचारी होते, ज्यांना वर्क फॉर्म होम न आवडल्याने त्यांनी राजीनामे दिले. या कर्मचाऱ्यांनी संख्या आकरा टक्के एवढी आहे. तसेच कार्यालयात येताना कोरोना नियमांचे पालन करणाऱ्यावरून देखील अनेकदा कर्मचारी आणि व्यवस्थापनात वाद झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.

नोकरी सोडण्यात भारतीय सर्वात पुढे

अनेक कर्मचारी आपल्या करीअरबाबत चिंतेत असतात. जर दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये चांगील संधी मिळाली. आहे त्यापेक्षा अधिक पगार मिळाला तर असे कर्मचारी आपल्या जुन्या नोकरीचा राजीनामा देतात आणि नवी नोकरी जॉईन करतात. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण याबाबत एकूण बारा देशातील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले की, भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेसिया, थायलंड या देशातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.