येत्या सहा महिन्यांत 86 टक्के भारतीय देणार नोकरीचा राजीनामा; काय आहेत जॉब सोडण्याची कारणे?

नोकरी सोडण्यात भारतीय जगात सर्वात पुढे असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात नोकरी सोडण्याचे प्रमाण आणखी वाढणार असल्याचा दावाही या अहवालामध्ये करण्यात आला आहे.

येत्या सहा महिन्यांत 86 टक्के भारतीय देणार नोकरीचा राजीनामा; काय आहेत जॉब सोडण्याची कारणे?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:14 AM

भारतात पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (Employees) आपल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कोरोना काळानंतर कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने याबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पुढील सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण 86 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चांगला पगार (Salary) आणि वर्क लाईफचे (Work Life Balance) योग्य संतुलन या दोन प्रमुख कारणांमुळे राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकते असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार 61 टक्के असे कर्मचारी आहेत जे चांगल्या वर्क लाईफसाठी राजीनामा देऊ इच्छितात. कोरोना काळानंतर राजीनामा देणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढू शकते असे या अहवालात म्हटले आहे.

अहवाल काय सांगतो?

या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी आपल्या सध्या सुरू असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे संबंधित संस्थांचे काम प्रभावित होऊ शकते. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम देण्यात आले होते. मात्र यातील असे देखील काही कर्मचारी होते, ज्यांना वर्क फॉर्म होम न आवडल्याने त्यांनी राजीनामे दिले. या कर्मचाऱ्यांनी संख्या आकरा टक्के एवढी आहे. तसेच कार्यालयात येताना कोरोना नियमांचे पालन करणाऱ्यावरून देखील अनेकदा कर्मचारी आणि व्यवस्थापनात वाद झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नोकरी सोडण्यात भारतीय सर्वात पुढे

अनेक कर्मचारी आपल्या करीअरबाबत चिंतेत असतात. जर दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये चांगील संधी मिळाली. आहे त्यापेक्षा अधिक पगार मिळाला तर असे कर्मचारी आपल्या जुन्या नोकरीचा राजीनामा देतात आणि नवी नोकरी जॉईन करतात. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण याबाबत एकूण बारा देशातील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले की, भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेसिया, थायलंड या देशातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.