AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान वठणीवर, भारताच्या अटींवर चर्चेस तयार, परराष्ट्रमंत्री म्हणाले, ‘ज्या पद्धतीने म्हणाल…’

पाकिस्तान भारताच्या अटींवर चर्चा करण्यास तयार झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भविष्य आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु भारतासोबत संघर्षाच्या परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान वठणीवर, भारताच्या अटींवर चर्चेस तयार, परराष्ट्रमंत्री म्हणाले, 'ज्या पद्धतीने म्हणाल...'
ishaq dar
| Updated on: Jun 05, 2025 | 9:17 AM
Share

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान वठणीवर आले आहे. पाकिस्तानला आता भारतासोबत चर्चा हवी आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भारतासोबत चर्चेसाठी इस्लामाबादची तयारी आहे. आमचा देश प्रत्येक स्तरावर चर्चा करण्यास तयार आहे. भारतासोबत आम्हाला व्यापक चर्चा करायची आहे.

सर्व मुद्यांवर चर्चा करणार

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, इस्लामाबादमधील एका पत्रकार परिषदेत इशाक डार यांनी म्हटले की, भारत जेव्हाही चर्चेसाठी म्हणत असेल, तेव्हा चर्चा करण्याची आमची तयारी आहे. कोणत्याही स्तरावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. चर्चेसाठी आमची तयारी असली तरी आम्ही निराश झालेलो नाही. पाकिस्तान सर्वच मुद्यांवर चर्चा करु इच्छितो. परंतु भारत फक्त दहशतवाद्यावर फोकस करत आहे.

डार यांनी म्हटले की, चर्चेसाठी दोन लोकांची गरज असते. चर्चेसाठी आमच्या इतके गंभीर इतर कोणीच नाही. डार यांचे संकते भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या वक्तव्याकडे होते. जयशंकर यांनी म्हटले होते की, पाकिस्ताससोबत चर्चा दहशतवादाचा मुद्यावर होणार आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर रिकामे करण्यावर होणार आहे.

पुन्हा संघर्षाची शक्यता नाही…

भारतासोबत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता विचारली असता, डार म्हणाले की, भविष्य आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु अशा कोणत्याही परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे. शस्त्रसंधीचा निर्णय अबाधित राहणार आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याशी संबंधित सर्व पावले अंमलात आणली आहेत. या परिस्थितीत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले.

पहलगाव येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर भारताने ६ ते ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली होती. भारताच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने परतवून लावले होते. यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आल्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.