
इराण आणि अमेरिका युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, हे युद्ध फार काळ चालणार नाही. चार आठवड्यांच्या आत युद्ध बंद होईल. मात्र, त्यांचा अंदाज चुकला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी मिळून मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिका अनपेक्षित धक्का इराणकडून देण्यात आला. अमेरिका या युद्धात एकटी पडली. अमेरिकेने काही देशांना या युद्धात मदत मागितली पण एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. अमेरिकेला युद्धात मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी थेट 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदी जाहीर केली. पण इराणला ही युद्धबंदी मान्य नसून त्यांच्याकडून मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडून काही देशांकरिता होर्मुज खाडी खुली करण्यात आली.
या युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. युद्धबंदीच्या कराराची बैठक पाकिस्तानमध्ये व्हावी, याकरिता पाककडून मोर्चेबांधनी केली जात आहे. यासोबतच त्यांनी इस्त्रायलला खळबळजनक धमकी दिली आहे. यादरम्यान पाकिस्तानला युद्ध सुरू असताना मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानने इराणसोबत एक मोठा करार केला आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या 20 जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याची परवानगी देण्यात आली.
पाकिस्तानमध्ये सध्याच्या घडीला ऊर्जेचे मोठे संकट आहे. इराणकडून त्यांच्या 20 जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याची परवानगी देण्यात आल्याने थेट दिलासा मिळाला. पाकिस्तानचे विदेश मंत्री इसहाक डार यांनी याबाबतची घोषणा केली. इसहाक दार यांनी आपल्या निवेदनात अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघझी यांना थेट टॅग केले आहे.
I am pleased to share a great news that the Government of Iran has agreed to allow 20 more ships under the Pakistani flag to pass through the Strait of Hormuz; two ships will cross the Strait daily.
This is a welcome and constructive gesture by Iran and deserves appreciation. It…
— Ishaq Dar (@MIshaqDar50) March 28, 2026
यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानने मोठा खेळ खेळला आहे. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या युद्धादरम्यान एक महिन्यात होर्मुज खाडीतून 150 जहाला गेले आहेत. दरमहिन्याच्या तुलनेत ही संख्या फारच जास्त कमी नक्कीच आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जगात ऊर्जेचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.