पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर, सीमेवर प्रचंड तणाव, पाकिस्तान लष्कराच्या हवाई..
Afghanistan Airstrike Pakistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर अफगाणिस्तानने दिले. अफगाणिस्तानकडून मोठा दावा करण्यात आला. थेट हल्ला पाकिस्तानवर अफगाणिस्तानने केला.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला. सतत एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने मोठा हवाई गल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांना जीव गमवावा लागला. काल रात्री उशिरा 30 जून रोजी अफगाण सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईला दुजोरा दिला. पुन्हा एकदा या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. इस्लामिक स्टेटची उपशाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासानच्या तळांना टार्गेट करण्यात आल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशात तणाव वाढला आहे. पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीने अफगाणिस्तानवर हल्ले करताना दिसत आहे.
पाकिस्तानने सोमवारी 29 जूनच्या मध्यरात्री अफगाणिस्तानमधील 3 प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. तालिबान राजवटीनुसार, या हल्ल्यांमध्ये 36 नागरिक मारले गेले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता अफगाणिस्तानने हल्ला केला. अफगाणिस्तानने 30 जूनच्या रात्री उशिरा पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांवर हवाई हल्ले केले.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले की, बलुचिस्तानमधील पिशिन जिल्ह्यातील सरनान बाजार भागात अफगाण लष्कराच्या ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य ठरलेली इमारत ही इस्लामिक स्टेट खोरासान या जागतिक दहशतवादी संघटनेची होती. पाकिस्तानमधून समोर आलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात टार्गेट करण्यात आलेली इमारत प्रत्यक्षात एक शाळा होती जिथे अफगाण लष्कराचे माजी सैनिक राहत होते.
या हल्ल्यात त्यापैकी तीन सैनिक जखमी झाले. तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर हे माजी सैनिक अहमद मसूद ज्युनियर यांच्या ‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट’मध्ये (NRF) सामील झाले होते. दोन्ही देश हल्ले करत आहेत. अफगाणिस्तान आणि भारताचे नाते चांगले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात देत आैषध गोळ्या पाठवल्या होत्या. यादरम्यान पाकिस्तानने भारतावर जोरदार टीकाही केली होती.
