AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला अजूनही भारताची दहशत, बिलावल भुट्टो यांना आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने जर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला तर पाकिस्तानला कारवाई करणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच भारताला पराभूत करण्याच्या परिस्थितीत आहोत, अशी धमकी बिलावल भुट्टो यांनी दिली.

पाकिस्तानला अजूनही भारताची दहशत, बिलावल भुट्टो यांना आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
| Updated on: Jun 29, 2025 | 9:39 AM
Share

ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार फटका खाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पाकिस्तान पीपुल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांनी संसदेत त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा उल्लेख करत भुट्टो म्हणाले, पाकिस्तानवरील धोका अजूनही टळलेला नाही. सिंधू जल वाटप कराराचा प्रश्न आहे. यामुळे भविष्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष होणार आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी केली पाहिजे, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.

भारत म्हणतो, हा ट्रेलर…

पाकिस्तानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, भारत अजूनही म्हणत आहे की हा फक्त ट्रेलर होता. बाकीचा चित्रपट पुढे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या तरुणांना ‘रोटी खाओ, वरना गोली खाओ’, असे सांगत आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने जर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला तर पाकिस्तानला कारवाई करणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच भारताला पराभूत करण्याच्या परिस्थितीत आहोत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

भुट्टो यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारताकडे दोन पर्याय आहेत. पाणी न्याय्य पद्धतीने वाटून द्या, अन्यथा आम्ही सर्व सहा नद्यांचे पाणी घेऊ. भारत आणि पाकिस्तानने १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सहा नद्यांच्या पाण्याचे वाटप प्रकरणात आहे. त्यापैकी तीन नद्या भारतात जातात आणि तीन पाकिस्तानला जातात.

सिंधू पाणी करारावर बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, भारताने सिंधू जल करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. हा करार पूर्ववत करणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू करावी. सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान युद्ध होऊ शकतो, असे भुट्टो यांनी म्हटले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.