AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला अजूनही भारताची दहशत, बिलावल भुट्टो यांना आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने जर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला तर पाकिस्तानला कारवाई करणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच भारताला पराभूत करण्याच्या परिस्थितीत आहोत, अशी धमकी बिलावल भुट्टो यांनी दिली.

पाकिस्तानला अजूनही भारताची दहशत, बिलावल भुट्टो यांना आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 29, 2025 | 9:39 AM
Share

ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार फटका खाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पाकिस्तान पीपुल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांनी संसदेत त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा उल्लेख करत भुट्टो म्हणाले, पाकिस्तानवरील धोका अजूनही टळलेला नाही. सिंधू जल वाटप कराराचा प्रश्न आहे. यामुळे भविष्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष होणार आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी केली पाहिजे, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.

भारत म्हणतो, हा ट्रेलर…

पाकिस्तानच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, भारत अजूनही म्हणत आहे की हा फक्त ट्रेलर होता. बाकीचा चित्रपट पुढे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, भारताचे पंतप्रधान पाकिस्तानच्या तरुणांना ‘रोटी खाओ, वरना गोली खाओ’, असे सांगत आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने जर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून केला तर पाकिस्तानला कारवाई करणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच भारताला पराभूत करण्याच्या परिस्थितीत आहोत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

भुट्टो यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारताकडे दोन पर्याय आहेत. पाणी न्याय्य पद्धतीने वाटून द्या, अन्यथा आम्ही सर्व सहा नद्यांचे पाणी घेऊ. भारत आणि पाकिस्तानने १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील सहा नद्यांच्या पाण्याचे वाटप प्रकरणात आहे. त्यापैकी तीन नद्या भारतात जातात आणि तीन पाकिस्तानला जातात.

सिंधू पाणी करारावर बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, भारताने सिंधू जल करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. हा करार पूर्ववत करणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू करावी. सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान युद्ध होऊ शकतो, असे भुट्टो यांनी म्हटले.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!