AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे.

वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 1:28 PM
Share

दुशांबे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे. शांघाई सहयोग संघटन म्हणजेच SEO संमेलन पंतप्रधान मोदी बोलत होते. अफगाणिस्तानात घडलेली ताजी घटना ही कट्टरतावाद किती मोठं आव्हान आहे हे स्पष्ट करते, त्यामुळे कट्टरतावादाविरोधातील लढाई ही केवळ क्षेत्रिय सुरक्षेसाठीच नाही तर तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही गरजेची असल्याचं मोदी म्हणाले. ( PM Modi’s remarks on radicalism in Afghanistan at SCO summit Welcome to Iran-Saudi Arabia-Qatar )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संमेलनात नव्याने सहभागी झालेल्या ईराणचं स्वागत केलं. मोदी म्हणाले, ‘यंदा SCO चं 20 वं वर्ष आहे, आनंदाची गोष्टी ही आहे की या चांगल्या मुहूर्तावर आपल्यासोबत नवीन मित्र आले आहेत. मी ईराणचं नवीन मित्राच्या रुपाने स्वागत करतो. मी तिन्ही नवीन डायलॉग पार्टनर सउदी अरब, इजिप्त आणि कतरचंही स्वागत करतो.’

SCOला मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात, उदारतावादी, सहिष्णु मुस्लिमांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एससीओने इस्लामशी निगडीत उतारवादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्था आणि परंपरांना मजबूत करण्यासाठी काम करायला हवं. भारतासह सर्वच इस्लामिक देशांमध्ये उदारतावादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्थानं आणि परंपरा आहेत. एससीओला या सर्वांमध्ये एक मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज आहे.

मोदी पुढे म्हणाले की, इतिहासावर नजर टाकली, तर मध्य आशिया हा उदारतावादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्यांचं माहेरघर राहिला आहे. सूफीवादासारखी परंपरा इथं शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. आणि हाच आपला वारसा आपल्याला जगामध्ये पसरवायचा आहे.

तंत्रज्ञानाच्या देवणाघेवणीवर भाष्य

मोदी म्हणाले की, आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी UPI असो, Rupe Card असो कि कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेलं आरोग्य सेतू आणि कोविन अॅप. ही सर्व डिजीटल टेक्नॉलॉजी आम्ही इतर देशांसोबत शेअर केली आहे आणि यापुढेही तंत्रज्ञान शेअर करत राहू.

आखाती देशांशी संवाद वाढवण्यास भारताचा पुढाकार

आशिया खंडातील देशांमध्ये संवाद वाढवण्याची गरज पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली. भारत मध्य आशियातील देशांसोबत आपले संबंध अधिक चांगले करण्यास कटीबद्ध आहे असं मोदी म्हणाले. पुढं ते म्हणाले की, भारतीय बाजाराशी जोडल्याने मध्य आशियायी देशांना खूप फायदा होणार आहे. संवाद हा एकतर्फी नसतो, त्यामुळे पुढाकार दोन्ही बाजूंनी घ्यायला हवा.

ताजिक लोकांच्या स्वागताने भाषणाची सुरुवात

पंतप्रधान मोदींनी ताजिक लोकांचं स्वागताने भाषणाची सुरुवात केली. हे संमेलन ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये होत आहे. तिथं मोदी म्हणाले की, मी संपूर्ण भारताकडून ताजिक बंधु-भगिणींचं स्वागत करतो.

शिखर बैठकीनंतर संपर्क बैठक होणार आहे, यामध्ये अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय क्षेत्रिय सुरक्षा, सहयोग आणि संवाद यावरही चर्चा होऊ शकते. ताजिकीस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत. भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित आहेत.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.