AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींनी डेन्मार्कमधील भारतीयांकडून एक वचन घेतले आहे, आणि त्यांनी ते वचन एकाच सुरात दिलेही…

मी पहिल्यांदाच डेन्मार्कला आलो आहे. मी तुमच्याकडून काय मागू शकतो, असं बोलत त्यांनी तेथील जनतेशी थेट संवाद साधत त्यांना ते म्हणाले मी काही मागितले तर ते तुम्ही मला देणार ना. त्यावेळी तेथील नागरिकांकडून त्यांच्या या हाकेला साथ देत उपस्थितांनी एकाच आवाजात हो म्हणाले.

नरेंद्र मोदींनी डेन्मार्कमधील भारतीयांकडून एक वचन घेतले आहे, आणि त्यांनी ते वचन एकाच सुरात दिलेही...
Image Credit source: Twitter
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 03, 2022 | 11:22 PM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कमध्ये भारतीय नागरिकांना (Indian nationals in Denmark) संबोधित करताना त्यांच्याकडून वचन घेतना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, दरवर्षी तुम्ही 5 परदेशी मित्रांना भेटायला पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि डेन्मार्कमधील ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध तसेच दोन्ही देशातील वाढत्या संबंधांबाबत चर्चा केली.

तसेच सहभाग आणि त्याच्या शक्यतांबद्दल त्यांनी यावेळी त्यांच्याशी चर्चा केली. भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना, मोदींनी भारताच्या वैशिष्ट्यांबद्दल तेथील नागरिकांना माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांना एक टास्कही दिला होता.

नरेंद्र मोदींच्या हाकेला साथ

भारतीयांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आज देश स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भारत अमृत महोत्सव साजरा करत आहे. ते म्हणाले की, मी पहिल्यांदाच डेन्मार्कला आलो आहे. मी तुमच्याकडून काय मागू शकतो, असं बोलत त्यांनी तेथील जनतेशी थेट संवाद साधत त्यांना ते म्हणाले मी काही मागितले तर ते तुम्ही मला देणार ना. त्यावेळी तेथील नागरिकांकडून त्यांच्या या हाकेला साथ देत उपस्थितांनी एकाच आवाजात हो म्हणाले. त्यावेळी नरेंद्र मोदी त्यांना म्हणाले की, तुमच्यापैकी अनेक जणांचे परदेशी मित्र असतील तर आजपासून एक संकल्प करा की, आपल्या मित्रांपैकी पाच परदेशी मित्रांना तुम्ही भारत पाहण्यासाठी पाठवा.

तुम्ही देशाचे लाखो राष्ट्रदूत

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपण आपल्या परदेशी मित्रांना भारतातील वेगवेगळ्या राज्यांबद्दल माहिती सांगून त्यांना ती ठिकाणे बघण्यासाठी प्रेरणा द्या. हे काम कोणताही राजदूत करु शकणार नाही मात्र तुमच्यासारखे लाखो राष्ट्रदूत ही गोष्ट सहज करु शकतात. तेथील भारतीयांशी संवाद साधताना आपल्या पंतप्रधानांनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळ्या भारतातील प्रदेशांची, प्रादेशिक सौंदर्याची विशेष गोष्टी सांगितल्या.

भारताला गौरवशाली इतिहास

या दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारताचा गौरवशाली भूतकाळही सांगितला, भारताच्या गौरवशाली भूतकाळाची चर्चा करताना सांगितले की, पूर्वी भारत बघण्यासाठी लोक चालत चालत भारतात येत होते. यावेळी त्यांनी चलो इंडिया हा नारा देऊन पुढे सांगितले की, जर आपण एका एका भारतीयाने पाच पाच परदेशी लोकांना जर भारतात पाठवला तर जगात एकाच डेस्टिनेशन असेल ते म्हणजे चलो इंडिया.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.