मोदींना मिळालेला सेऊल शांती पुरस्कार महत्त्वाचा का?

सेऊल: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने सेऊल शांती पुरस्काराने गौरवलं. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरले. दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात मोदींनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ईन यांची भेट घेऊन दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी सियोल शांती पुरस्कार भारतीय जनतेला समर्पित केला. भारताने नेहमीच जगाला शांततेचा संदेश दिला. महात्मा […]

मोदींना मिळालेला सेऊल शांती पुरस्कार महत्त्वाचा का?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

सेऊल: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने सेऊल शांती पुरस्काराने गौरवलं. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरले. दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात मोदींनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ईन यांची भेट घेऊन दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

मोदींनी सियोल शांती पुरस्कार भारतीय जनतेला समर्पित केला. भारताने नेहमीच जगाला शांततेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्यावर सियोल शांती पुरस्कार मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे, असं मोदी म्हणाले.

सर्व रक्कम नमामि गंगेला

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या सन्मानाची संपूर्ण रक्कम नमामि गंगा फंडला देणार असल्याचं जाहीर केलं.

दहशतवाद जगभरात चिंतेची बाब

यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. जगभरात आज दहशतवाद ही चिंतेची बाब आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकजूट होण्याची गरज आहे. विश्वशांतीसाठी दहशतवाद ही गंभीर समस्या आहे, असं मोदींनी नमूद केलं.

मोदींना मिळालेला सन्मान महत्त्वाचा का?

सियोल शांती पुरस्कार 1990 पासून दिला जातो. हा पुरस्कार आतापर्यंत संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यासारख्या दिग्गजांना मिळाला आहे. यामध्ये आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर लागला आहे.

या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नामांकने आली होती. पुरस्कार समितीने त्याली 150 नावं शॉर्टलिस्ट केली होती. या 150 नावांमधून पंतप्रधान मोदींच्या नावावर एकमत झालं. त्यामुळे मोदींना ‘द परफेक्ट कँडिटेट फॉर द 2018 सियोल पीस प्राईज’ म्हणून गौरवण्यात आलं.

दक्षिण कोरियाची भारताला साथ

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ईन यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत, दहशतवादाविरोधाच्या लढाईत आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.