AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 20 मिनिटे थांबले असते तर मृत्यूच समोर होता…बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा दावा

Sheikh Hasina new claim: मागील वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना हिंसक जमाव जमला होता. हा जमाव पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसला होता. त्यापूर्वीच शेख हसीना त्या ठिकाणावरुन बाहेर पडल्या. अन्यथा त्या दिवशी त्यांची हत्या झाली असती.

फक्त 20 मिनिटे थांबले असते तर मृत्यूच समोर होता...बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा दावा
sheikh-hasina
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 18, 2025 | 2:45 PM
Share

Sheikh Hasina new claim: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. भारतात आल्यानंतर शेख हसीना यांनी अनेक दावे केले आहेत. आता शेख हसीना यांनी बांगलादेशच्या अवामी लीग फेसबुक पेजवर एक ऑडियो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण त्या ठिकाणी 20 ते 25 मिनिटे अधिक थांबलो असतो तर आपली हत्याच झाली असती, असा म्हटले आहे. आपणास मारण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच माझी लहान बहीण शेख रेहाना यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

शेख हसीना यांनी काय म्हटले?

मागील वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना हिंसक जमाव जमला होता. हा जमाव पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसला होता. त्यापूर्वीच शेख हसीना त्या ठिकाणावरुन बाहेर पडल्या. अन्यथा त्या दिवशी त्यांची हत्या झाली असती. 21 ऑगस्ट 2024 रोजी हिंसक जमावापासून वाचणे आणि कोटलीपारा बॉम्ब हल्ल्यातून वाचणे हे केवळ अल्लाहच्या मर्जीमुळे झाले. माझ्या हातून अजून काही कामे करायची बाकी आहे. यामुळे आपणास अल्लाहने वाचवले, असे शेख हसीना यांनी म्हटले. परंतु मला आपला देश आणि आपल्या घरापासून लांब राहवे लागत आहे.

शेख हसीनाविरोधात वॉरंट

शेख हसीना यांनी सांगितले की, आपल्या हत्येचा कट यापूर्वी रचण्यात आला होता. 21 ऑगस्ट 2004 रोजी आपल्या सभेच्या वेळी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. त्यात 24 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मलाही थोड्या जखमा झाल्या होत्या. परंतु त्या हल्ल्यातून मी वाचले.

दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीना विरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यांच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात अचानक लोक गायब झाल्यामुळे हा वॉरंट काढला आहे. त्यात त्यांच्या प्रशासनाने 500 पेक्षा जास्त व्यक्तींचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले की, शेख हसीना यांना आता न्यायालयासमोर आले पाहिजे.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!