AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 20 मिनिटे थांबले असते तर मृत्यूच समोर होता…बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा दावा

Sheikh Hasina new claim: मागील वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना हिंसक जमाव जमला होता. हा जमाव पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसला होता. त्यापूर्वीच शेख हसीना त्या ठिकाणावरुन बाहेर पडल्या. अन्यथा त्या दिवशी त्यांची हत्या झाली असती.

फक्त 20 मिनिटे थांबले असते तर मृत्यूच समोर होता...बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा दावा
sheikh-hasina
| Updated on: Jan 18, 2025 | 2:45 PM
Share

Sheikh Hasina new claim: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. भारतात आल्यानंतर शेख हसीना यांनी अनेक दावे केले आहेत. आता शेख हसीना यांनी बांगलादेशच्या अवामी लीग फेसबुक पेजवर एक ऑडियो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण त्या ठिकाणी 20 ते 25 मिनिटे अधिक थांबलो असतो तर आपली हत्याच झाली असती, असा म्हटले आहे. आपणास मारण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच माझी लहान बहीण शेख रेहाना यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

शेख हसीना यांनी काय म्हटले?

मागील वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना हिंसक जमाव जमला होता. हा जमाव पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसला होता. त्यापूर्वीच शेख हसीना त्या ठिकाणावरुन बाहेर पडल्या. अन्यथा त्या दिवशी त्यांची हत्या झाली असती. 21 ऑगस्ट 2024 रोजी हिंसक जमावापासून वाचणे आणि कोटलीपारा बॉम्ब हल्ल्यातून वाचणे हे केवळ अल्लाहच्या मर्जीमुळे झाले. माझ्या हातून अजून काही कामे करायची बाकी आहे. यामुळे आपणास अल्लाहने वाचवले, असे शेख हसीना यांनी म्हटले. परंतु मला आपला देश आणि आपल्या घरापासून लांब राहवे लागत आहे.

शेख हसीनाविरोधात वॉरंट

शेख हसीना यांनी सांगितले की, आपल्या हत्येचा कट यापूर्वी रचण्यात आला होता. 21 ऑगस्ट 2004 रोजी आपल्या सभेच्या वेळी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. त्यात 24 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मलाही थोड्या जखमा झाल्या होत्या. परंतु त्या हल्ल्यातून मी वाचले.

दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीना विरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यांच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात अचानक लोक गायब झाल्यामुळे हा वॉरंट काढला आहे. त्यात त्यांच्या प्रशासनाने 500 पेक्षा जास्त व्यक्तींचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले की, शेख हसीना यांना आता न्यायालयासमोर आले पाहिजे.

Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.