AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीवने घेतलेल्या या निर्णयामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला

india maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध सध्या तणावाचे बनले आहेत. याचा फायदा चीनकडून घेतला जात आहे. चीन समर्थक मानले जाणारे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष चीनच्या षडयंत्राचा भाद बनले आहे. चीन नेहमीच छोट्या देशांना गुलाम करण्याचा प्रयत्न करत राहिला आहे.

मालदीवने घेतलेल्या या निर्णयामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 07, 2024 | 6:10 PM
Share

INDIA VS CHINA :  भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव दररोज वाढत चालला आहे. चीन याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबध बिघडले आहेत. कारण मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष हे चीन समर्थक आहेत. आता मालदीवमध्ये चीनचे जहाज येत असल्याने भारताने याला विरोध दर्शवला आहे. चीन शियांग यांग हाँग 03 हे जहाज मालदीवला पाठवत आहे. या आठवड्यात ते माले येथे पोहोचणार आहे. ज्यामुळे भारत, चीन आणि मालदीवमध्ये तणाव वाढला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, हे जहाज वैज्ञानिक संशोधनासाठी जात आहे. पण मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने काही काळापूर्वी म्हटले होते की चीनचे जहाज त्यांच्या सागरी क्षेत्रात थांबणार नाहीये. शिवाय ते कोणत्याही प्रकारचे संशोधन देखील करणार नाहीये.

संशोधन करण्यासाठी आले जहाज

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, ‘चीनचे सागरी क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन कार्यासाठी हे जहाज येत आहे. जे सागरी कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या तरतुदींचे पालन करणार आहे. अनेक वर्षांपासून चीन आणि मालदीव सागरी वैज्ञानिक संशोधनात काम करत आहे.

चीन Xian Yang Hong 03 या जहाजाचा वापर लष्करी उद्देशांसाठी करतो. हिंद महासागरात तो या जहाजाच्या माध्यमातून हेरगिरी करतो. या कारणास्तव, भारताने चिनी जहाज दीर्घकाळ थांबल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

चिनी जहाज आता मालदीवमध्ये गेले आहे, यासंदर्भात काही काळापूर्वी मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने भारतावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की, मालदीव नेहमीच मित्र देशांच्या जहाजांचे स्वागत करणारा देश आहे.

मालदीव सरकारने म्हटले होते की चिनी जहाजाने रोटेशन आणि इंधन भरण्यासाठी राजधानी माले येथे थांबण्याची परवानगी मागितली होती. चीनचे जहाज मालदीवच्या सागरी क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य करणार नाही, असे सरकारने म्हटले होते.

भारताचा आक्षेप

चीन नेहमीच हेरगिरी करण्याच्या उद्देशाने आपली जहाजे शेजारील देशांमध्ये डॉक करत असतो. याआधी अनेकदा भारतीय लष्कराने हेरगिरीचा आरोप केला आहे. चिनी जहाजे याआधी ही अनेकवेळा तामिळनाडूजवळ श्रीलंकेच्या क्षेत्रात थांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण यावर भारताने नेहमी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे श्रीलंकेने आता चिनी जहाजे थांबवण्यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल