AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Earthquake : हिमालय हादरला… पुन्हा हाहा:कार? तिबेटमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; टेन्शन नेपाळला

हिमालयीन प्रदेशात चिंतेचे वातावरण आहे. नेपाळमधील जलप्रलयानंतर तिबेटमध्ये ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते, ज्यात शेकडो लोक बेपत्ता झाले आणि व्यापार मार्गही तुटला.

Earthquake : हिमालय हादरला... पुन्हा हाहा:कार? तिबेटमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; टेन्शन नेपाळला
Tibet earthquakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 5:06 PM
Share

नेपाळमध्ये जलप्रलयाने हाहाकार उडालेला असतानाच आणखी एका घटनेने हिमालय परिसर हादरला आहे. तिबेटमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 5.0 एवढी होती. त्यामुळे तिबेटमधील नागरिक भयभीत झाले आहेत. सात दिवसांपूर्वी नेपाळमध्ये जलप्रलय आला होता. त्याचा फटका तिबेटलाही बसला होता. तिबेटमध्येही महापूर आल्याने 100 लोक बेपत्ता झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता भूकंप आल्याने तिबेटीयन नागरिक भयभीत झाले आहेत.

तिबेटमध्ये आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. मात्र, भूकंप होताच तिबेटमधील नागरिकांनी लगेच घराबाहेर पळ काढला. आहे त्या परिस्थितीत सर्वच जण जीवमूठीत घेऊन पळाले. तसेच पूर वगैरे तर आला नाही ना? याची माहिती घेण्यासही नागरिकांनी सुरुवात केली. बराच वेळ घराबाहेर काढल्यानंतर आणि धोका टळल्याची खात्री पटल्यानंतर तिबेटीयन नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र, भूकंपामुळे देशाला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे.

जीवित हानी नाही, पण चिंता वाढली

मात्र, या भूकंपामुळे हिमालयाच्या परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. भूकंपाच्या झटक्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये. 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने शास्त्रज्ञही भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

नेपाळ आणि तिबेटला फटका

दुसरीकडे 26 ऑगस्ट रोजी नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात आणि चीन-तिबेटच्या क्षेत्रात अचानक महापूर आला होता. हा महाविनाशकारी पूर होता. ग्लेशियर तुटल्याने नदीत जाऊन पडला. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. ग्लेशियरमुळे नैसर्गिक सरोवर तयार झालं. त्यातच पाण्याचा दाब वाढला आणि नंतर बांध फुटून हे पाणी प्रचंड आक्राळविक्राळ लाटांसह गावागावात घुसलं. त्यामुळे नेपाळच्या रासुवा जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे.

नेपाळच्या या जलप्रलयात 1200 हून अधिक लोक मृत्यूमुखा पडले आहेत. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. या जलप्रलयात नेपाळची गावे जमीनदोस्त झाली. घरे, इमारती, पूल, टॉवर सर्व काही पाण्यात जमीनदोस्त झालं. शेती वाहून गेली. रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा अजूनही जनसंपर्क तुटलेला आहे. अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. नेपाळमधील डेडबॉड्या बिहारमध्ये वाहून येत आहेत. आज सात दिवस झाले तरी नेपाळची परिस्थिती सावरलेली नाहीये.

केवळ नेपाळलाच नाही तर या जलप्रलायाचा सर्वाधिक तिबेटलाही बसला आहे. नेपाळ आणि तिबेट दरम्यान असलेला ऐतिहासिक व्यापारी मार्गच वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार ठप्प झाला आहे. दोन्ही देशांना जोडणारा हा एकमेव पारंपारिक रस्ता होता. तिबेटमध्येही पूर आल्याने या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं. तिबेटमधील पुरात 100 लोक बेपत्ता झाले आहेत.

Follow Us
रात्री 1 वाजता पोलीस घरात घुसले अन्... सामाजिक कार्यकर्त्याला अटक, कार
रात्री 1 वाजता पोलीस घरात घुसले अन्... सामाजिक कार्यकर्त्याला अटक, कारण...
विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया आली समोर
CM Fadnavis On Vidyanand Bapat Attacked | विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...
कोकणवासीयांसाठी मोठी गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू
कोकणवासीयांसाठी मोठी गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू; गणेशोत्सवाआधी मोठा दिलासा
आदित्य ठाकरे भेटीसाठी आले असतानाचा आंदोलक... 'त्या' व्हिडीओमध्ये नेमकं
आदित्य ठाकरे भेटीसाठी आले असतानाचा आंदोलक... 'त्या' व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला... एकनाथ शिंदेंची एका वाक्यातच...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला... एकनाथ शिंदेंची एका वाक्यातच प्रतिक्रिया
पाऊस नाही, पण कांद्याला भाव भारी! धुळ्यात 4,000 ते 4,500 पार
Dhule | पाऊस नाही, पण कांद्याला भाव भारी! धुळ्यात 4,000 ते 4,500 पार; विहिरीच्या पाण्यावरच...
महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर...
Arvind Sawant | महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर... अरविंद सावंतांचा शिंदे गटावर थेट हल्ला
कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत
Vidyanand Bapat | कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण अटकेत
मोठी खळबळ! रात्रीच्या सुमारास अचानक... भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड,
मोठी खळबळ! रात्रीच्या सुमारास अचानक... भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड, व्हिडिओ आला समोर
गरिबांच्या लेकरांचा घास चोरला... पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता
Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर