AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा धक्का! टॅरिफमुळे भारत संकटात? जे नको होतं तेच करावं लागणार

अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर भारतासाठी चीनशी संबंध सुधारणे आवश्यक झाले आहे. भारतासाठी 'चायना प्लस वन' धोरण स्वीकारणे आता कठीण होणार आहे. अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारातील नुकसानानंतर चीनशी संबंध राखणे भारतासाठी गरजेचे आहे.

मोठा धक्का! टॅरिफमुळे भारत संकटात? जे नको होतं तेच करावं लागणार
Modi Trump and jinpingImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 02, 2025 | 12:29 PM
Share

अमेरिका अजूनही जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. तिथल्या राष्ट्राध्यक्षाची ताकद इतकी आहे की, ते संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरवू शकतात. असेच काही सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्यांनी भारतासह जगातील इतर देशांवर टॅरिफचा असा चाबूक चालवला आहे की, येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताची ‘चायना प्लस वन’ रणनीतीही अयशस्वी होताना दिसत आहे. कारण या क्षणी भारत इच्छा असूनही चीनशी नाते तोडू शकत नाही. अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारातील नुकसानानंतर चीनशी संबंध राखणे भारतासाठी आवश्यक आहे.

भारताने जगाला हे दाखवण्याचा खूप प्रयत्न केला की, तो चिनी कारखान्यांचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी ‘चायना प्लस वन’ रणनीती अंतर्गत पावले उचलली गेली, ज्यामध्ये कंपन्या चीनबरोबरच इतर देशांमध्ये गुंतवणूक करतात. पण आता हा प्रयत्न कमकुवत होताना दिसत आहे. अलीकडेच अमेरिकेने नवे टॅरिफ लादले, त्यानंतर नवी दिल्लीतील अधिकारी आणि व्यापारी अजूनही या बदललेल्या वातावरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Viral Video: मगरींनी घेरलं, पण ‘आकाशाचा राजा’ने वाचवले! सिंहच्या बछड्याच्या खतरनाक व्हिडीओ

तणावादरम्यान पंतप्रधान मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची नुकतीच भेट झाली. सात वर्षांनंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटले. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमध्ये काहीसा नरमपणा येण्याची आशा आहे. भारताचा ‘चायना प्लस वन’ दृष्टिकोन त्याच्या कारखाना शक्ती बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात उत्पादन वाढवणे भारतासाठी आवश्यक आहे, जेणेकरून तरुण कामगारांच्या बेरोजगारीसारख्या समस्यांचे निराकरण होऊ शकेल. पण आता अमेरिकेचा पाठिंबा कमी होत असल्याने चीनपासून अंतर राखणे कठीण वाटत आहे.

चीनशी व्यापार करणे गरजेचे आहे का?

चीन नेहमीच भारतात आपला व्यापार वाढवण्यास उत्सुक आहे. त्यांच्यासाठी भारताचे बाजारपेठ हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे हा व्यापार भारतासाठीही तितकाच आवश्यक वाटत आहे जितका तो चीनसाठी आहे. कारण अमेरिकी टॅरिफमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी भारताला इतरत्र व्यापाराचे पर्याय शोधावे लागतील. त्यात चीन हा प्रमुख पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताला सध्या परकीय चलनाचीही गरज आहे.

अमेरिकी टॅरिफमुळे खळबळ

अमेरिकेच्या नव्या टॅरिफने पुरवठा साखळ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. भारत आता अमेरिकी आयातदारांसाठी तितका आकर्षक राहिला नाही. कंपन्या कमी टॅरिफ असलेल्या देशांकडे, जसे की व्हियतनाम किंवा मेक्सिकोकडे वळू शकतात. अलीकडेच एका अमेरिकी न्यायालयाने टॅरिफ अवैध ठरवले, पण ट्रम्प यांच्या अपीलपर्यंत ते लागू ठेवण्यात आले आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील दरी कमी झालेली नाही.

Follow Us
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.