AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतापासून 4000 किलोमीटर दूर आहे तुर्की, तरीही का बनला आपला दुश्मन ?

तुर्कीची सीमा भारताला लागून नाहीए, तरीही भारतापासून ४००० किलोमीटर दूरवर असलेला तुर्की आपला दुश्मन का बनला आहे ? पाकिस्तानला तुर्कीसारखी मदत का करत आहे ?

भारतापासून 4000 किलोमीटर दूर आहे तुर्की, तरीही का बनला आपला दुश्मन ?
| Updated on: May 14, 2025 | 8:05 PM
Share

काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात झालेल्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानला सातत्याने मदत केली आहे.दोन्ही देशांच्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानची मदत करणे हे काही नवीन नाहीए…पाकिस्तानला तुर्कीने दिलेल्या ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशात सुरु असलेल्या संघर्षात तुर्कीने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. खासकरुन काश्मीर मुद्द्यावर तुर्कीने नेहमीच पाकिस्तानला पाठींबा दिला आहे.भारतापासून ४००० हजार किमीवर असलेला हा देश भारताचा जानी दुश्मन का बनला ते पाहूयात…

तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची मुस्लिम उम्माहच्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा असल्याने तो सातत्याने पाकिस्तानचे समर्थन करत आला आहे. तुर्कीची सीमाला चीन सारखी आपल्या देशाला लागून नाही त्यामुळे जमिनीचाही कोणताही वाद नसतानाही तुर्की केवळ धर्मासाठीच पाकची तळी उचलून धरत असल्याचे स्पष्ट आहे.

 1948 पासून तुर्कियेचे भारताशी संबंध

भारतापासून सुमारे 4000 किलोमीटर हवाईअंतरावर तुर्की आहे. तुर्की आशिया आणि युरोप दोघांचा हिस्सा आहे. तुर्कीचा जादा हिस्सा हा आशियात मोडतो. आणि एक छोटासा हिस्सा युरोपात येतो. त्यामुळेच तुर्की नाटोचाही सदस्य आहे.भारत आणि तुर्की दरम्यान 1948 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. जास्तीत जास्त काळ दोन्ही देशांचे संबंध चांगले राहीले आहेत. परंतू अलिकडे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्या सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांच्या नात्यात कटूता आली आहे.

मग भारताच्या विरोधात का ?

भारत आणि तुर्की यांच्या दरम्यान कोणत्याही मुद्यावरुन झडप झालेली नाही. तरीही एर्दोगान ( २००३ ) सत्तेत आल्यानंतर तो पाकिस्तानची बाजू घेत आला आहे आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या विरोधात राहीला आहे. वास्तविक एर्दोगान यांचे स्वत:चे राजकारण मुस्लीम कट्टरतावादाकडे झुकलेले आहे.त्याच कारणाने पाकिस्तानची साथ देऊन ते आपल्या मतदारांना खुश करु इच्छित आहे.त्यामुळे त्यांना त्यांच्या देशातील कट्टर पंथीयांचे समर्थन मिळत आहे. त्याच जोरावर ते सत्तेत टीकून आहेत.

त्याचमुळे ते सातत्याने भारताच्या विरोधात बोलत असतात. तसेच एर्दोगान तुर्कीला ऑटोमन साम्राज्यसारखा प्रभाव शाली बनविण्याचे स्वप्नही भारत विरोधी स्टँडचे कारण आहे. तुर्की मुस्लिम उम्माह म्हणजे सर्व मुस्लीम देशांना एकत्र येण्याची विनंती करताना दिसत आहेत. एर्दोगान यांना मुस्लीम जगताचा नेता बनण्याचे स्वप्न त्यांना पाकच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडत आहे.

भारत विरोधी भूमिका महागात पडणार ?

भारत-पाकिस्तानच्या दरम्यान अलिकडेच झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही तुर्कीने पाकिस्तानची तळी उचलून धरली आहे.त्याचा मोठा फटका तुर्कीला बसणार आहे.भारतात तुर्कीच्या विरोधात बायकॉट मोहीम सुरु झाली आहे. लोक तुर्कीच्या सामानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरुन येणाऱ्या मालावर बहिष्काराची घोषणा केली आहे.

तीन लाख भारतीय तुर्की देशात पर्यटनाला

दरवर्षी तीन लाख भारतीय तुर्की देशात पर्यटनाला जात असतात.या घटनेमुळे या पर्यटनात भारतीयांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने तुर्कीसाठीची बुकींग बंद केली आहे. तेथील पर्यटन विभागाचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत. या दोन देशांदरम्यान १२ अब्ज डॉलरचा व्यापार होत आहे.

भारत आणि तुर्कीमध्ये मोठा व्यापार होतो

भारत तुर्कीला वाहनांचे सुटे भाग आणि मोटार वाहने, कापड आणि तयार कपडे, सेंद्रिय रसायने, रत्ने आणि दागिने, चहा, कॉफी आणि मसाले, लोखंड आणि स्टील उत्पादने निर्यात करतो.तर तुर्कीमधून भारत यंत्रसामग्री आणि उपकरणे, खनिज इंधन आणि तेल, तांबे आणि तांबे उत्पादने, चेरी आणि डाळींब आणि खते आयात करतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.