AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात उलटे शूज आणि चप्पल ठेवल्याने नुकसान होते का? जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य

Myth: आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहोत, त्यात अनेक गोष्टी खोट्या ठरतात, तर कधी काही गोष्टी खऱ्या असतात. एखादी शिकवलेली, ऐकलेली गोष्ट पूर्णपणे खोटी असू शकत नाही का? आज आपण अशाच ऐकलेल्या गोष्टीबद्दल ऐकणार आहोत, ज्यासाठी तुम्ही लहानपणी खूप बोलणी खाल्ली असतील.

घरात उलटे शूज आणि चप्पल ठेवल्याने नुकसान होते का? जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य
shoes chappal infront of homeImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 10, 2023 | 12:24 PM
Share

मुंबई: आपण लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकतो, पण जेव्हा आपण त्या गोष्टींसह मोठे होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचे सत्य जाणून घ्यावेसे वाटते. आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहोत, त्यात अनेक गोष्टी खोट्या ठरतात, तर कधी काही गोष्टी खऱ्या असतात. एखादी शिकवलेली, ऐकलेली गोष्ट पूर्णपणे खोटी असू शकत नाही का? आज आपण अशाच ऐकलेल्या गोष्टीबद्दल ऐकणार आहोत, ज्यासाठी तुम्ही लहानपणी खूप बोलणी खाल्ली असतील.

लहान असताना अनेक गोष्टींसाठी आपल्याला बोलणी बसायची. विशेषत: घरात चप्पल उलटी ठेवली तर त्यामुळे अनेक गोष्टी ऐकायला लागायच्या, त्या म्हणजे घरात चप्पल आणि बूट उलटे ठेवायचे. आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती विशेषतः आपली आजी, आपले आजोबा यावरून आपल्यला फार बोलायचे आठवतंय? वडीलधाऱ्यांनी अडवल्यावर आपण लगेच चप्पल सरळ करायचो. पण तुम्हाला माहित आहे का घरात चप्पल उलटी ठेवल्यावर नेमकं काय होतं? त्याने खरंच काही वाईट होतं का?

उलटा बूट किंवा चप्पल दिसली तर लगेच सरळ करा, अन्यथा लक्ष्मी नाराज होते आणि पैशाचे नुकसान होते, असे सांगितले जायचे. याशिवाय घरातील सकारात्मकता संपुष्टात येऊन घरातील वातावरणात अशांतता पसरते असंही आपल्याला ऐकवलं जायचं. यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नसले तरी केवळ लोकच यावर विश्वास ठेवतात.

तसं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की, हे सगळं घरातल्या धार्मिक श्रद्धेमुळे बोललं गेलं होतं. पण याचं एक कारण म्हणजे चप्पल उलटी ठेवली तर घर चांगलं दिसणार नाही. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होतो. त्यामुळे आपण चप्पल आणि शूज सरळ बाजूने आणि योग्य ठिकाणी ठेवले पाहिजेत असा यामागचा हेतू असायचा. यामागे कोणतीही अंधश्रद्धा ठेवायचं कारण नाही. आपल्या चप्पल उलटी ठेवल्याने कुणालाही त्याचा त्रास नको इतकाच हेतू यामागे असायचा.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.