AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर…

नवदाम्पत्याने लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनावश्यक शॉपिंग, खर्चिक दिखावा, निकृष्ट वस्तू खरेदी करणे आणि बाहेर खाण्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळा. बजेट डायरी तयार करा, गरजा ओळखा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. यामुळे तुमचा संसार सुखी होईल आणि भविष्यात आर्थिक चणचण भासणार नाही.

Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर...
newly married coupleImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 27, 2026 | 7:10 PM
Share

लग्नानंतर नवरा बायको म्हणून दोघांना संसार करावा लागतो. संसारासाठीच्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. आर्थिक ताळमेळ संतुलित ठेवावा लागतो. नाही तर घर खर्चाचं गणित बिघडतं. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने अत्यंत सुखाचे जातात. पण नंतर जबाबदारी स्वत: घ्यावी लागेत. त्यानंतर संसाराला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येतो. सुरुवातीला केलेली उधळपट्टी नंतर अंगाशी येते. त्यामुळे पहिल्यापासूनच आर्थिक नियोजनावर भर दिला पाहिजे. नाही तर सर्व गणित बिघडण्याची शक्यता असते. अत्यंत उत्साहात किंवा जोशात येऊन निर्णय घेऊन चालत नाही. डोकं शांत ठेवून आणि संयमाने निर्णय घ्यावे लागतात. ज्यांचं नुकतच लग्न झालंय त्यांनी खालील चार गोष्टींचं पालन केलंच पाहिजे. नाही तर आर्थिक चणचण वाट्याला आलीच म्हणून समजा.

कपल्सने पैसा कसा वाचवावा?

>> एक्स्ट्रा शॉपिंग –

लग्न ठरताच मुलं आणि मुली भरभरून शॉपिंग करत असतात. महागड्या साड्या आणि ड्रेस घेतले जातात. विशेष म्हणजे या महागड्या साड्या आणि ड्रेस वर्षभर कोणी घालत नाही. लग्नाच्या दिवशीच किंवा त्यानंतर एखाद दोन वेळाच काय ते हे कपडे परिधान केले जातात. नंतर ते कपाटात एका साईडला पडून असतात. मुलंही ब्रँडेड सूट आणि बूट घेतात. त्यावर हजारो रुपये खर्च करतात. काही लोक लाखो रुपयेही खर्च करतात. पण सहा महिन्यानंतर कपाट उघडल्यावर कळतं की यातील अर्ध्या गोष्टी वापरण्याच्या योग्यतेच्या राहिल्या नाहीत.

>> बडेजाव करू नका –

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. इन्स्टाग्रामवर भराभर रिल्स तयार केल्या जातात. फेसबुकवर फोटोंचा रतीब घातला जातो. त्यासाठी कपल्स महागड्या इंटरनॅशनल ट्रिप्सचा प्लान करतात. लोन घेऊन किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करून विदेशात जातात. खूप धमाल करतात. पैशांची उधळपट्टी करतात. पण सहा महिन्यानंतर मात्र हाच खर्च त्यांच्या अंगाशी येतो. कारण प्रत्येक महिन्याला कर्जाचा हप्ता भरावा लागतो. हप्ते भरून जीव नको नकोसा होतो. कारण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. त्यामुळे महागड्या ट्रिपला जाऊ नका. आपल्या बजेटमध्येच ट्रिपचा प्लान करा. बडेजाव केला तर तो नेहमी अंगाशीच येतो हे कायम लक्षात ठेवा.

>> ड्युप्लिकेट वस्तू घेऊ नका

नवीन संसार थाटण्याच्या नादात कपल्स नेहमी गरज नसलेल्या वस्तू घेतात. शो पीस, महागड्या क्रॉकरी आणि ज्यांचा वापर वर्षभरही केला जात नाही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूही खरेदी केल्या जातात. अनेकदा तर स्वस्त मिळतंय म्हणून ड्युप्लिकेट वस्तूही खरेदी करण्यात येतात. या ड्युप्लिकेट वस्तूंना क्वॉलिटी नसते, त्यामुळे त्या तीन ते चार महिन्यातच खराब होतात.

>> बाहेरचं खाणं…

अनेकांना तर बाहेरच्या खाण्याची भार हौस असते. बाहेर ऑर्डर देऊन अन्न पदार्थ मागवले जातात. विकेंड पार्टीच्या नावाने पैशाची उधळपट्टी केली जाते. सिनेमा पाहायला जाणं आणि बाहेरचं खाणं यामुळे खिशाला मोठी कात्री बसते.

हे करा, म्हणजे बजेट वाचेल

० बजेट डायरी – एक बजेट डायरी तयार करा. महिन्याचा किती खर्च येईल आणि किती बचत होईल याची यादी तयार करा. त्यामुळे तुम्हाला खर्चाचा अंदाज येईल.

० गरज – तुमची गरज काय आहे? हे ओळखा. कोणत्याही वस्तू घेताना याची गरज आहे का? याच्या शिवाय काम अडून राहते का? हे दोन प्रश्न मनाला विचारा. त्यातून जे उत्तर येईल त्याला फॉलो करा.

० गुंतवणूक – बडेजाव करण्यासाठी पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी चांगली गुंतवणूक करा. बचत झाली तर त्याचा पुढे उपयोग होईल.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...