केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल?

यातील अनेक ठिकाणे व्यापारी व सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित झाली. अशा तऱ्हेने त्या वेळच्या भारतातील राजधान्यांची यादी तयार केल्यास पाटलिपुत्र, कोलकाता आणि दिल्ली या शहरांची नावे या यादीत समाविष्ट होतील. पण केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल का? 

केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल?
General knowledge
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 28, 2023 | 6:09 PM

मुंबई: आजच्या काळात भारताची राजधानी कोणती असे तुम्हाला विचारले तर तुम्ही सर्व जण सहज सांगाल की भारताची राजधानी दिल्ली आहे. मात्र, दिल्लीला नेहमीच भारताची राजधानी होण्याचा दर्जा नव्हता. किंबहुना मध्ययुगीन काळात देशाची अनेक राज्यांत विभागणी झाली होती आणि प्रत्येक राज्याची स्वतःची राजधानी होती. यातील अनेक ठिकाणे व्यापारी व सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित झाली. अशा तऱ्हेने त्या वेळच्या भारतातील राजधान्यांची यादी तयार केल्यास पाटलिपुत्र, कोलकाता आणि दिल्ली या शहरांची नावे या यादीत समाविष्ट होतील. पण केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल का?

भारताची एक दिवसाची राजधानी

खरं तर एका दिवसाची राजधानी होण्याचा मान मिळवलेल्या भारतातील शहराचे नाव आहे अलाहाबाद. या शहराला सध्या प्रयागराज म्हणतात. इ.स. १८५८ मध्ये अलाहाबादला एका दिवसासाठी भारताची राजधानी घोषित करण्यात आले. ज्या वेळी अलाहाबादला भारताची राजधानी बनवण्यात आले, त्या वेळी ही वायव्य प्रांताची ही राजधानी होती आणि ब्रिटिशांनी तेथे उच्च न्यायालय आणि अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली.

अलाहाबाद, ज्याला सध्या प्रयागराज म्हणून ओळखले जाते, याची स्थापना १५८३ मध्ये मुघल सम्राट अकबराने केली होती. अकबराने त्याचे नाव अलाहाबाद ठेवले. मुघल साम्राज्याच्या काळात ही एक प्रांतीय राजधानी बनली आणि १५९९ ते १६०४ पर्यंत सम्राट जहांगीरचे मुख्यालय देखील होते. मोगलांच्या पतनानंतर १८०१ मध्ये हे शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले. हे शहर १८५७ च्या मध्यात ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय बंडाचे केंद्र होते आणि नेहरू घराण्याचे निवासस्थान आहे.