AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये सोबत नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार… रेल्वेचा नियम वाचला का?

Railway Guidelines Ghee: रेल्वे प्रवासात तुपाचा डब्बा सोबत नेला तर काय होते? तुमचे सामान खरंच जप्त करण्यात येते का? काय सांगतो रेल्वेचा तो नियम? रेल्वे प्रवासात या वस्तू घेऊन जाताना अगोदर विचार करा.

ट्रेनमध्ये सोबत नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार... रेल्वेचा नियम वाचला का?
| Updated on: Jun 30, 2026 | 10:13 PM
Share

Railway Guidelines Ghee: भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा नेटवर्क आहे. एका दिवसात कोट्यवधी शेतकरी एका दिवसात दुसर्‍या ठिकाणापर्यंत प्रवास करतात. प्रवाशांची सुरक्षा, सुविधा आणि प्रवासदरम्यान एक व्यवस्था ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक नियम लागू होतात. अर्थात काही नियमांची माहिती प्रवाशांना नसते. त्यामुळे कळत-नकळत प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होते. रेल्वे प्रवासात ज्वलनशील वस्तू, पदार्थ नेण्यासंदर्भात नियम आहेत. या वस्तू घेऊन प्रवास करता येत नाही. तर अटी आणि शर्तींसह काही सामान नेता येते. अशा नियमामुळे एक व्यवस्था टिकून राहते. तर यामुळे जोखीम आणि असुविधाही टळते. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

तुपासंदर्भात रेल्वेचा नियम काय?

तुपाचा वापर भारतीय स्वयंपाक घरात केला जातो. अनेक अन्नपदार्थात तुपाचा वापर होतो. पण रेल्वे प्रवासात तूप नेताना काळजी घ्यावी लागते. सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने रेल्वेतून प्रवास करताना तूप व्यवस्थितरित्या डबाबंद करूनच नेता येते. जर तूप रेल्वेत सांडले. तर प्रवासी घसरून पडण्याची भीती असते. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. तूप, ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत येते. त्यामुळे रेल्वेत आग लागण्याची शक्यता असते. रेल्वेतून तूप नेताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

रेल्वेतून किती तूप नेता येते?

भारतीय रेल्वेने तुपाचा डब्बा घेऊन जाण्याविषयी काही नियम केले आहेत. प्रवासी ट्रेनमध्ये तूप घेऊन जाऊ शकतात. पण त्याची एक मर्यादा आहे. रेल्वे नियमानुसार, एक प्रवासी कमाल 20 किलोपर्यंत तूप घेऊन जाऊ शकतो. हे तूप सीलबंद, हवाबंद डब्यात नेता येते. त्यासाठी अर्थातच रेल्वे अधिकाऱ्याची, प्रशासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तुपाचा डब्बा हा चांगला पॅक असावा. तो घट्ट बंद असावा. पॅकिंग एकदम चांगले हवे. हा तुपाचा डब्बा उघडायला नको. तो सांडायला नको. उघड्या भांड्यात अथवा कमकुवत डब्ब्यात, प्लास्टिक बॉटलमध्ये तूप नेता येत नाही. सुरक्षित पॅकिंग नसले तर रेल्वे प्रशासन तुपाचा डब्बा जप्त करू शकते. डब्बा योग्यरित्या बंद करणे आवश्यक आहे.

रेल्वेचा हा नियम कशासाठी?

तूप हे दिसायला साधं वाटतं असलं तरी रेल्वेत ज्वलनशील पदार्थ आणता येत नाही. त्यामुळे जोखीम निर्माण होऊ शकते. जर तूप सांडले तर त्यावर प्रवासी घसरून पडू शकतात. तूप हे ज्वलनशील असल्याने आगीचा धोकाही असतो. किंगविषयी नियम कडक आहेत. जर 20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई होऊ शकते. रेल्वेत अशा वस्तू नेण्याअगोदर नियम जाणून घेणे आवश्यक असते.

नियम तोडला तर काय?

जर एखाद्या प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही तर रेल्वे त्याच्याविरोधात कारवाई करू शकते. अशा प्रकरणात सामान जप्ती केली जाऊ शकते. प्रवासाला दंड होऊ शकतो. गंभीर परिस्थितीत कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासात सामान घेण्याविषयी काही नियमांचे पालन करावे लागते. त्यासाठी रेल्वे गाईडलाईन महत्त्वाची आहे.

Follow Us
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा