AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways: विना तिकीट रात्रीच्यावेळी प्रवास… TTE रेल्वेतून उतरवू शकतो का?

Indian Railways Tickets : भारतीय रेल्वेतून प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी पकडल्या जातात. त्यासाठी मोहीम सुद्धा राबवली जाते. रात्रीच्या वेळी विना तिकीट जर एखादा प्रवासी सापडला तर त्याला तिकीट तपासणीस रेल्वेतून उतरवून देऊ शकतो का? याविषयीचे काय आहेत नियम?

Indian Railways: विना तिकीट रात्रीच्यावेळी प्रवास... TTE रेल्वेतून उतरवू शकतो का?
भारतीय रेल्वे तिकीटImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 3:33 PM
Share

Indian Railways Tickets : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणतात. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या देशभरात हजारो ट्रेन रोज धावतात. देशात हजारो रेल्वे स्टेशन आहे. येथूनच प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करणे सोपे जाते. रेल्वे प्रवासासाठी तिकिटासंबंधीचे नियम आहेत. भारतीय रेल्वेतून प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी पकडल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासन मोहीम राबवते आणि अशा फुकट्या प्रवाशांकडून वसूली सुद्धा करण्यात येते. दंडही लावला जातो. पण रात्रीच्या वेळेस एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळला, तर त्याला तिकीट तपासणीस रेल्वेतून उतरवून देऊ शकतो का?

काय सांगतो नियम?

या नियमांचा उद्देश प्रवास अधिक सुविधाजनक करणे हा आहे. अनेकदा वेळेअभावी आणि झटपट इच्छित स्थळ गाठण्यासाठी अनेकदा रात्रीच्यावेळीस अथवा इतर कारणामुळे, पैसे नसल्याने, तिकीट काढण्याची इच्छा नसल्याने काही जण ट्रेनमध्ये विना तिकीट चढतात. अशावेळी विना तिकीट प्रवास केला म्हणून तिकीट तपासणीस त्यांना रात्रीच्यावेळी रेल्वेतून उतरवून देऊ शकतो का? याविषयीचे नियम काय आहेत? विना तिकीट ट्रेनमधून प्रवास केल्यास रेल्वे नियमांचे उल्लंघन आहे. पण थेट काही गुन्हा नाही. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, विना तिकीट यात्रा करणे चुकीचे आहे. त्यासाठी दंडाची तरतूद आहे. टीटीई अशा प्रवासात प्रवाशांकडून नियमानुसार, दंडाची वसूली करू शकतो.

रात्री-अपरात्री कोणत्याही स्टेशनवर उतरवू शकतो?

जर रेल्वेचा विना तिकीट प्रवास करताना प्रवाशी आढळला तर छोट्या, असुरक्षित आणि एकदम निर्मनुष्य रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशाला उतरवले जात नाही. रेल्वेच्या नियमात हे स्पष्ट करण्यात आले आहे की प्रवाशाची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे विना तिकीट प्रवाशी आढळला तर त्याला टीटीई दंड आकारून पुढील सुरक्षित रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करण्याची मुभा देतो.

अर्थात जर विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी टीटीईसोबत गैरवर्तन करत असेल, गोंधळ घालत असेल अथवा इतर प्रवाशांना इजा होईल असे वर्तन करत असेल तर कारवाई होऊ शकते. टीटीई रेल्वे सुरक्षा दल, RPF च्या जवानांकडे अशा प्रवाशाला सोपवू शकतो. असा प्रवाशाविरोधात कायदेशीर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नेहमी प्रवास करताना तिकीट सोबत असू द्या. विना तिकीट प्रवास करू नका. पण मोठ्या कारणामुळे विना तिकीट प्रवास करावा लागल्यास तिकीट तपासनीस आल्यास त्याच्याकडून तिकीट तयार करून घ्या. त्यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होईल आणि कोणताही अडथळा येणार नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी