EMI भरला नाही तर मोबाईल होणार नाही लॉक, RBI चा नियमात मोठा बदल, थेट ग्राहकांना..
ईएमआयवर मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र, बऱ्याचदा जर हप्ते वेळेवर भरली नाही तर बँकाकडून किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून संबंध डिव्हाइस बंद केले जाते. मात्र, आता RBI ने यात मोठे बदल केली आहेत.

आपल्याकडे अनेक लोक वस्तू ईएमआयवर घेतात. घरात लागणाऱ्या वस्तूही ईएमआयवर घेतल्या जातात. त्यातच मोबाईल, लॅपटॉपही ईएमआयवर घेतली जातात. मात्र, ईएमआय थकल्यानंतर बँक किंवा वित्तीय संख्य संबंधित डिव्हाइस रीमोटने लॉक करतात. ज्यामुळे जर EMI थकले तर ग्राहक अधिक अडचणीत सापडतो. आता कंपन्यांची किंवा बँकची अशी दादागिरी अजिबात चालणार नाही. यावर कडक पाऊले RBI कडून उचलण्यात आलीत. हा नवीन नियम 1 जानेवारी 2027 ला लागू केला जाईल. ईएमआय थकल्यानंतरही मोबाईल किंवा संबंध डिव्हाइस कंपनीला लॉक अजिबात करता येणार नाही. तुम्ही पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ईएमआयवर वस्तू खरेदी केली असेल तर ती आता लगेचच लॉक होणार नाही. RBI च्या नवीन नियमानुसार, तुमचे डिव्हाइस बंद होऊ शकणार नाही. कर्जाचा हप्ता 30 दिवसांपेक्षा जास्त थकला तर निर्बंध लावले जाऊ शकत नाहीत.
60 दिवसांपेक्षा अधिक काळ तर हप्ता थकला तर डिव्हाइस लॉक करण्याची परवानगी आहे. ज्यामुळे ग्राहकांना हप्ते भरण्यासाठी अधिकचा वेळ मिळण्यास मदत होईल. यासोबतच RBI ने स्पष्ट केले की, डिव्हाइस सेवा पूर्णपणे बंद करता येणार नाही. इनकमिंग काल, एसएमएस सेवा सुरू राहिल ग्राहकांना दैनंदिन व्यवहार करता यावीत, आपत्कालीन नंबरही पूर्णपणे बंद होणार नाही.
यासोबतच ग्राहकाच्या पर्सनल डेटाबद्दलची RBI ने कडक निर्बंध घातली आहेत. बँका किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या संपर्क यादी, फोटो, व्हिडीओ, एसएमएस, कॉल माहिती, लोकेशन डेटा किंवा इतर माहिती पाहू शकणार नाहीत. डिव्हाइस लॉक करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान डेटा संरक्षणाच्या नियमात असणे आवश्यक आहे.
RBI ने स्पष्ट केले की, नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना कर्ज वेळेपूर्वी पूर्णपणे फेडण्याचा अधिकार कायम असणार आहे. मात्र, डिव्हाइस लॉक करण्याच्या प्रक्रियेमुळे या अधिकारावर कोणताही परिणाम होणार नाही. कर्ज देणाऱ्या संस्था किंवा बँका RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक निर्बंध ग्राहकांना डिव्हाइस लागू करू शकणार नाहीत.